"सनई चौघडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सनई-चौघडा ही मंदिरात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या ओ...
(काही फरक नाही)

००:१३, ३० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

सनई-चौघडा ही मंदिरात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या ओट्यांवरून वाजणारी आणि लग्नसमारंभ, उद्‌घाटन समारंभ यांसारख्या मंगल प्रसंगी वाजणारी वाजणारी वाद्यांची जोडगोळी आहे. सनई, संबळ, सूर धरणारी पेटी आणि चौघडा या सर्वांच्या एकत्रित वादनाला वाजंत्री म्हणतात.

लग्नातल्या मंगलाष्टकांच्या अंतिम ओळी म्हणून झाल्या की ‘वाजवा रे वाजवा’ घोष आणि त्यानंतर वाजंत्री वादन सुरू होई. मंगलकार्य संपन्न झाले, असे जाहीर करणार्‍या चौघड्याचा पहिला दणका झाला की, सनईवर 'अहिर भैरव' रागातील धून सुरू होते. परंपरावादी सनईवादक नंतर ‌दिवसभरात वेगवेगळ्या रागांच्या सुरांचे गुंजन चालू ठेवतात. जेवणाची पंगत बसली की, वृंदावनी सारंग सुरू होतो.

पारंपरिक भारतीय संस्कृतीत सनई या सुषिरवाद्याला (भोके असलेल्या नळीत फुंकर मारून वाजवल्या जाणार्‍या वाद्याला) खूप महत्त्व होते. पहाटेच्या मंगलमय शांत वातावरणात दिवसाची सुरुवात गावागावांतून मंदिरांमध्ये सनई या मंजुळ वाद्याने करण्याची प्रथा होती. गडांच्या आणि वाड्यांच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या देवडीवर दिवसाचा प्रारंभ सनई-चौघड्याने होत असे. भविष्यात दिगंत कीर्ती लाभलेली अनेक सनईवादकांच्या यशाचा प्रारंभ मंदिराच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या निनादणाऱ्या चौघडा-सनईवादनाने होत असे. महाराष्ट्राचे विख्यात सनईवादक शंकरराव गायकवाड हेही एक चौघडाचमूचे वादक होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहनाईनवाझ बिस्मिल्लाखान हेही वाराणसीच्या काशी-विश्वेश्वराच्या मंदिरासमोर सनईवादन करीत असत.