"मधुलिका अग्रवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय शास्त्रज्ञ
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या ‘वायू प्रदूषणाचा वनस्पतींव...
(काही फरक नाही)

१३:४६, १४ जुलै २०१६ ची आवृत्ती

प्रा. डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या ‘वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम’ ह्या विषयाच्या भारतातील अग्रगण्य संशोधक मानल्या जातात.

प्रा. मधुलिका अग्रवाल यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्‌सी. पी‍एच्‌.डी केले आणि त्या फुलब्राइट फेलोशिप मिळवून अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बेल्ट्सव्हील अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करायला गेल्या. इंग्लंडमध्ये लँकेस्टर येथील रॉयल सोसायटी – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिपही मिळाली.

मधुलिका अग्रवाल यांचे संशोधन

जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा एक विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज त्यांनी बांधला.

पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन केलेल डॉ. अग्रवाल यांचे ‘‘अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बनडाय ऑक्साइड यांचा काही विशिष्ट धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम’ या विषयातील संशोधन मोलाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.