"अब्दुल अझीझ रायबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख अब्दुल अझिझ रायबा वरुन अब्दुल अझीझ रायबा ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
'''ए.ए. रायबा''' तथा '''अब्दुल
ते मूळचे कोकणी असून त्यांचे वडील शिंपीकाम करीत असत.
टेमकर स्ट्रीटवरली इमारत डळमळीत होऊन पडल्यावर रायबा कुटुंबीय नालासोपाऱ्याला गेले आणि रायबा केवळ प्रदर्शनांपुरतेच मुंबईत दिसू लागले.
{{बदल}}
Line ८ ⟶ १०:
जे.जे.मध्ये रायबा १९४२ ते ४६ या काळात शिकले. तिथे चार्लस जेरार्ड व जगन्नाथ अहिवासी हे दोन शिक्षक त्यांना लाभले. जगन्नाथ अहिवासी हे भारतीय चित्रशैलीपरंपरेचे शिक्षण देत. रायबांनी, भारतीय लघुचित्रांची पद्धती, तंत्र व शैली अहिवासींकडूनच शिकून आत्मसात केली. तर तैलरंग, त्यांची हाताळणी जेरार्ड यांच्याकडून. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण रायबांच्या चित्रशैलीत दिसून येते.
शिक्षण झाल्यानंतर रायबांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी संपर्क साधला. वयाच्या पंचविशीत ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ची त्यांना संगत लाभली. या चित्रकारसमूहातील रूडी व्हॉन लायडन आणि वॉल्टर लँगहॅमर यांच्या सांगण्यावरूनच ते काश्मीरला गेले. तेथे पाच वर्षें राहिले. या पाच वर्षांच्या कालावधीचा परिणाम म्हणून
मुंबईत आल्यावर उपजीविकचे साधन शोधताना रायबांनी चित्रकार [[एम.एफ. हुसेन]] यांच्या ओळखीने चित्रपट दिग्दर्शक [[के.आसिफ]] यांच्याकडे थोडे दिवस काम केले. नंतर हुसेन आरा यांच्यासोबत फर्निचर डिझाइनचेही काम केले.
जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा
तागाच्या (तरटासारख्या जाड) कापडाला फेव्हिकॉल पातळ करून, त्यात टेक्श्चरव्हाइट पावडर मिसळून या मिश्रणाचे थर लावल्यास तागाचा शोषकपणा थोडा बुजतो, मग त्यावर तैलरंगांतही चित्रे करता येतात, हे तंत्र रायबांनी शोधले. एक सुकल्यावर दुसरा, असे १५-१६ थर लावून रायबांनी ‘तागाचा कॅनव्हास’ हे दृश्यवैशिष्टय़ सांभाळले. काश्मीर, पोर्तुगीज वसाहती, वसई, मुंबईचे कोळीवाडे अशा जनजीवनांतील स्वप्नवत् सृष्टी टिपणारे रायबा तंत्राचा सतत विचार करीत. १९८०च्या दशकात ते मुद्राचित्रण शिकले, त्यानंतर त्यांनी केलेली मुद्राचित्रे आजही नावाजली जातात.
==ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमध्ये रायबांना दोनदा रौप्यपदके (१९४७, १९५१) मिळाली, आणि काश्मीरहून परत आल्यानंतर सन १९५६ मध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले.
* दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा
* 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता.
Line २५ ⟶ ३०:
[[वर्ग:मराठी चित्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
|