"भोरगिरी किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २०:
राजगुरुनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावर, भीमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले आहे.
शिवाजीच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोर्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी असून, पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते. भोरगिरी ते भीमाशंकर हे फक्त सहा किमीचे अंतर. तो एक सुंदर ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात. भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर असली, तरी पायथ्यापासून तो जेमतेम दीडशे मीटर आहे.
भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरुनगरपासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे.
==कसे जावे==
|