"गोविंद बाबाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९०६ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
'''गोविंद बाबाजी जोशी''' (जन्म : इ.स.
'''गोविंद आबाजी जोशी''' हे विचाराने सुधारक होते. विधवाविवाह त्यांना मान्य होता. त्यांनी लिहिलेल्या ’हिंदू लोकांस विनंति’ व ’वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ’ या दोन, बालविवाह आणि वृद्धांचे विवाह यांपासून होणाऱ्या अनर्थाची कल्पना देणाऱ्या पुस्तकांवरून त्यांची विचारधारा स्पष्ट होते.
गोविंद बाबाजी यांचे सर्वात मोेठे कार्य म्हणजे रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची त्यांनी केलेली डागडुजी. १८८६ साली त्यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था पाहून त्यांनी स्वत: इंजिनीयर किल्ल्यावर धाडला. समाधीची डागडुजी, तिच्यावर बांधावयाची मेघडंबरी, जगदीश्वराच्या देवळाची दुरुस्ती या कामांचा अंदाजे खर्च तयार करून घेतला व दुरुस्ती पू्रणत्वास नेली..
▲देशातील अडाणी जनतेला तिच्या दुःखाची आणि हक्कांची जाणीव करून द्यावी, आणि सुस्थितीचा मार्ग दाखवावा या उद्देशाने '''गोविंद बाबाजी जोशी''' यांनी हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांतून प्रवास करून देशाभिमान, नीती, परोपकार, सत्य आदी विषयांवर ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे भाषणे दिली. प्रवासात भेट दिलेल्या स्थळांची ऐतिहासिक, धार्मिक सामाजिक अशी साद्यंत माहिती जमवून ती जोशींनी पुस्तकरूपाने प्रकाशित केली. त्यांच्या ’गेल्या तीस वर्षापूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी)’ या प्रवासवर्णनात प्रथमच रोजनिशी पद्धतीचा वापर केलेला आहे. ही रोजनिशी म्हणजे १९व्या शतकातील समाज कसा होता याचे चित्रच आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांत १८८७ सालचे काँग्रेसचे मद्रास येथील अधिवेशन, १८९४ सालचे लाहोरचे अधिवेशन आणि १८९८ सालची राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची सुसंगत माहिती दिलेली आढळते.
देशातील अडाणी जनतेला तिच्या दुःखाची आणि हक्कांची जाणीव करून द्यावी, आणि सुस्थितीचा मार्ग दाखवावा या उद्देशाने '''गोविंद बाबाजी जोशी''' यांनी हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांतून प्रवास करताना देशाभिमान, नीती, परोपकार, सत्य आदी विषयांवर ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे भाषणे दिली.. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातले आद्य हिंदू मिशनरी म्हणतात.
==गोविंद बाबाजी जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ११ ⟶ १५:
* रायगड किल्ल्याचे वर्णन - छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धाराविषयी प्रार्थना (१८९१)
* लाहोरचा प्रवास - प्रवासाची व सामाजिक परिषदेची हकीकत (१८९५)
* वृद्धपणी लग्न करण्यापासून
* हिंदू लोकांस विनंती (१८८५)
==चरित्रग्रंथ==
लेखक अरुण रा. जोशी यांनी ’गोविंद बाबाजी जोशी (वसईकर) - एक उपेक्षित समाजसुधारक’ या नावाने गोविंद बाबाजींचे चरित्र लिहून केव्हातरी इ.स. १९४६च्या अगोदर प्रकाशित केले आहे.
==पुन:प्रकाशन==
काही वर्षांपूर्वी उन्मेष अमृते, अमित जठार आणि गिरीश ढोके या तिघा मित्रांच्या गप्पात दुर्मिळ पुस्तकांचा विषय निघाला. अनेक लेखकमंडळी, अभ्यासक १९ व्या शतकात होऊन गेली आणि त्यांचे साहित्य आज शोध घेऊनही सापडत नाही. अशी दुर्मिळ पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचे आणि अनमोल ठेवा जतन करण्याचे तिघांनी ठरवले. 'रॊजनिशी' हे त्यांतले पहिले पुस्तक आहे.
|