"साहिर लुधियानवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''साहिर लुधियानवी''' तथा '''अब्दुल हयी'''<ref name=tri>[http://www.tribuneindia.com/2004/20041024/spectrum/main5.htm Sahir: The poet lives on] [[The Tribune (Chandigarh)|The Tribune]], 24 October 2004.</ref> (जन्म : [[लुधियाना]]- [[पंजाब]], [[८ मार्च]] [[इ.स. १९२१|१९२१]]; मृत्यू :[[लुधियाना]] मुंबई, [[पंजाब]] - [[२५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९८०|१९८०]]) हे एक प्रसिद्ध [[कवी]] आणि हिंदी चित्रपट गीतकार होते.
 
संगीतकार एस. डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. १९५१मध्ये आलेल्या 'नौजवान' चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिले नाही. हे गीत होते - 'ठंडी हवाएं लहराके आये, रुतु है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...'
 
प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या 'बाजी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेते देवानंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.
 
पश्चिम बंगालमधील 'बाऊल' परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणाऱ्या 'आन मिलो आन मिलो शाम सवेरे...' हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारे ठरले.
 
प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे. 'ठंडी हवाएं लहराके आये...'नंतर देवानंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या 'चुप है धरती चुप है चाँद सितारे...' या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता.
 
गुरुदत्तचा 'प्यासा' हा चित्रपट साहिर-एसडी बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळसाध्याय म्हणावा लागेल. 'प्यासा' चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नावे झळकलेली दिसायची. मात्र, 'प्यासा'चे यश हे फक्त त्यातील गीत रचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते. एसडी बर्मन यांच्या ते जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण 'प्यासा'तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीते अक्षरश: 'महान' असली तरी ये 'दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है...'ला तोड नाही.
 
सचिन बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ. पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने 'नया दौर', 'तुमसा नही देखा' असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. या शब्दांची जादू आजही संपलेली नाही.
 
संगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. मात्र, 'कभी कभी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'मै पल दो पल का शायर...' हे शब्द अनेकांना हेलावून सोडले. साहिर यांनी त्यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचे बोलले गेले.
 
हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामध्ये 'हम दोनो'ची ही गीते येतात. - 'अल्लाह तेरो नाम... कभी खुद पे कभी हालात पे... तसंच, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...' अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र, 'अभी ना जाओ छोड कर...' यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.
 
साहिर यांचे 'चित्रलेखा' चित्रपटातील गीत : संगीतकार रोशन यांनी 'यमन' रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका उंचीवर नेलेले - 'मन रे तू काहे ना धीर धरे...' खूप गाजले.
 
आर. डी. बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केले. 'आ गले लग जा'मधील त्यांच्या 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...'तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. मात्र, 'जोशिला'मधील 'किसका रस्ता देखे ऐ दिल ऐ हरजाई...' हे तात्त्वि शब्द वेड लावून जातात.
 
== प्रसिद्ध गीते==