"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
''स्वातंत्र्यवीर'' '''विनायक दामोदर सावरकर''' ([[मे २८|२८ मे]], [[इ.स. १८८३]]:[[भगूर]] - [[फेब्रुवारी २६|२६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९६६]]) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर [[भारत|भारतीय]] राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, [[हिंदू धर्म|हिंदुसंघटक]] व [[हिंदू धर्म|हिंदुत्वाचे]] एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, [[विज्ञान|विज्ञानाचा]] पुरस्कार व [[जातिभेद|जातिभेदाला]] तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, [[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी]] व [[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|लिपिशुद्धी]] ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत [[साहित्यिक]] आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
 
त्यांना '''स्वातंत्र्यवीर''' अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांनी दिली.
 
== चरित्र ==
ओळ ७८:
 
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
 
==सावरकरांची खोली==
* पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिबशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
* सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील एका स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेली धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
 
==संस्था==