"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५५७:
* घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
* पती माझे छत्रपती (संजय पवार). छत्रपती या शब्दाने शिवाजीची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर, ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
* जय भीम, जय भारत या नाटकातल्या ’खैरलांजी’, कुत्रे’, ’रमाबाईनगर’ आदी शब्दांना परिनिरीक्षण मंडळाने हरकत घेतली आहे; या शब्दांऐवजी अनुक्रमे वैरांजली, श्वान, मीराबाईनगर असे शब्द वापरावेत अशी त्यांची सूचना आहे.
* बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
* ’बेबंदशाही’ आणि ’आग्र्याहून सुटका’ या नाटकांत शिवाजीला टाळ्या मिळत असल्याने नाटकांवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून नाटकाचे लेखक औंधकर यांनी शिवाजीपेक्षा औरंगजेबाचे महत्त्व वाढवून प्रयोग पुढे चालू ठेवले.
|