"इंद्रायणी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा|लोणावळ्याच्या]] कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्‍यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही तुळापूर गावाजवळ [[भीमा नदी]]स मिळते.
 
[[कुंडलिका नदी]] (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. वडिवळे धरण कुंडलिकावर आहे.
 
कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
 
==राम झरा==
राम झरा हा या इंद्रायणी नदीला मिळणारा मुख्य नाला आहे. या झर्‍याचा उगम पुणे जिल्ह्यातील भोसरी जवळच्या चिखली येथील जाधववाडीत होतो व कुदळवाडीतून वाहत वाहात चिखली-मोई फाट्याजवळ तो इंद्रायणीत विलीन होतो.
 
हा झरा बाराही महिने वाहत असतो, त्यामुळे या झर्‍यात जलचरांचा मोठा वावर आहे. संत तुकाराम जेव्हा आळंदीला पायी वारी करायचे त्यावेळेस ते चिखली गावाजवळील ह्या झर्‍यावर आराम करून तेथे पाणी पिऊन पुढे जायचे.
 
हळूहळू या झर्‍याला गटारगंगेचे स्वरूप आले. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, हरगुडे वस्ती व तेथील बंदिस्त गोदामात रसायने साठविणारे सर्व व्यापारी, त्रिवेणी नगर व तेथील पावडर कोटिंग व्यवसाय करणारे यांचे रिकामे रसायन कंटेनर, पोती, बॅगा वगैरे भंगाराचा व्यवसाय करणारे व्यापारी घेतात व राजरोजपणे त्या वस्तू धुऊन त्यांतले घातक रसायन युक्त पाणी बेधडकपणे राम झर्‍यात सोडून देतात. रासायनिक कंपनीतील रसायनांचे रिकामी बॅरेल्स नाल्या शेजारच्या भंगार शेडमध्ये धुऊन पुन्हा विकले जातात.
 
कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली इंद्रायणी नदी, राम झर्‍यात सोडल्या जाणार्‍या घातक रसायनांमुळे आणखीनच प्रदूषित होत आहे.
 
{{विस्तार}}