"मृणालिनी साराभाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
निधन |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Mrinalini Sarabhai.jpg|इवलेसे]]
'''मृणालिनी साराभाई''' (माहेरच्या मृणालिनी स्वामिनाथन) (जन्म : [[केरळ]], [[११ मे]], [[इ.स. १९१८]]; मृत्यू :
==खानदानी नृत्यपरंपरा==
मृणालिनी साराभाई ऊरफ अम्मा यांचे नृत्यखानदान म्हणजे त्यांच्या कन्या मल्लिका साराभाई व नातू रेवंत या दोघा नर्तकांपुरते मर्यादित नसून अनेक शिष्यांचेही आहे आणि शिष्य नसूनही अनेकांना, अभिजात नृत्यातून समकालीन प्रश्नांशी संबंधित विषय मांडण्याची प्रेरणा देणारेही आहे. भरतनाट्यमला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्र’ने जे चेन्नईतून केले होते; तर दाक्षिणात्य अभिजात नृत्यप्रकारांना वर्तमानाचे भान देण्याचे मोठे काम मृणालिनीअम्मांनी केले. पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९९२) आणि संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९९४) हे देशी व अनेक विदेशी सन्मान मग आपणहूनच आले.
==पूर्वायुष्य==
अंतराळशास्त्रज्ञ [[विक्रम साराभाई]] यांच्या पत्नी म्हणून त्या १९४२ अहमदाबादेत आल्या. हे घराणे कापड उद्योगात स्थिरावलेले आणि गांधीजींच्या चळवळीत रस घेणारे; तर केरळमधील मूळच्या मृणालिनी स्वामिनाथन यांचे वडील बॅरिस्टर, आई स्वातंत्र्यसैनिक आणि सख्खी ज्येष्ठ बहीण [[आझाद हिंद सेना|आझाद हिंद सेनेतील]] पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल. आझाद हिंद फौजेतील ‘कॅप्टन लक्ष्मीं’प्रमाणे धाकट्या मृणालिनी रणरागिणी नव्हत्या, पण नृत्यातून मानवमुक्तीची लढाई त्या अखेरपर्यंत लढल्या. नृत्यनाट्ये भारतात आधीही केली जात, आनंदशंकर तर त्यासाठी प्रसिद्धच होते. मात्र पौराणिक वा भावुक कथांवर आधारित नृत्यनाट्यांना मृणालिनी यांनी सामाजिक जाणीव दिली. मीनाक्षी सुंदरम पिल्लै यांच्याकडून भरतनाट्यम्, ताकाळी कुंचू कुरूप यांच्याकडून कथकली आणि कल्याणीकुट्टी अम्मन यांच्याकडून मोहिनीअट्टम शिकल्यावर त्या टागोरांच्या शांतिनिकेतनात शिकल्या आणि त्याहीआधी, वयाच्या १२-१३ व्या वर्षी स्वित्झरलंडमध्ये बॅलेचेही धडे गिरवले. या सार्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या नृत्यनाट्यांत दिसतो.
==दर्पणा नृत्य अकादमी==
विक्रम आणि मृणालिनी यांचा प्रेमविवाह हा ‘शास्त्र व कलेचा संसार’ होता. [[विक्रम साराभाई]] यांनीच १९४८ मध्ये ‘दर्पणा नृत्य अकादमी’ स्थापण्यात पुढाकार घेतला. अहमदाबादेत प्रथम विद्यार्थी मिळेनात, पण दहा वर्षांत अकादमी बहरली आणि १९६३ पासून मृणालिनी यांनी पारंपरिक नृत्यशैलींची अभिजात परिभाषा कायम राखून नृत्यनाट्ये बसविणे सुरू केले. १९७७ मध्ये कन्या मल्लिका साराभाई यांच्या हाती ‘दर्पणा’ची सूत्रे त्यांनी सोपवली आणि अगदी अखेरपर्यंत येथेच त्या शिकवत राहिल्या! मल्लिकांनी ‘दर्पणा’ वाढविले, तेथे ‘नटराणी’ हे वर्तुळाकार प्रेक्षागार उभारले आणि मुख्य म्हणजे, ‘अम्मा’देखील नव्या नृत्यनाटय़ांत सहभागी होतील, याची काळजी अनेकदा घेतली. अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत या मायलेकींनी मिळून नृत्यनाट्ये आणि मार्गदर्शन शिबिरे केली होती. वयाच्या नव्वदीतही ‘अम्मा’ नृत्याविष्कारांबद्दल, त्यातील बदलांबद्दल सजग असत.
{{विस्तार}}
|