"अब्दुल अहद रहबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. जौनपूरच्या अब्दुल अजीज अन्सारी डिग्री कॉलेजचे ते माजी प्राचार्य आहेत.
भागलपूरमध्ये झालेल्या हिंदुु-मुस्लिम दंग्यांनंतर डॉ. अब्दुल अहद रहबर यांनी आयुष्यभर हिन्दूमुस्लिम एकतेसाठी काम करण्याचे व्रत घेतले. त्यांनी स्वतःच्या नावाने मुस्लिम रहबर रामायण लिहिले आहे.
इस्लाम धर्मीय डॉ. रहबर यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. भारताला ते अध्यात्म योगाची आणि आयुर्वेदाची भूमी मानतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत भाषेला पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे भारतातील तरुण रामायणासारख्या ग्रंथाचे वाचन करावयास असमर्थ ठरतात. रामायणाचे हिंदीत रूपांतर करण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे. त्यांच्या मते राम हा असा नायक आहे की जो मानवता, मूल्य, दया, करुणा आणि जगण्याचे धडे शिकवतो.
|