"जितेंद्र उधमपुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. जितेंद्र उधमपुरी (जन्म : उधमपूरजवळ, इ.स. १९४४) हे एक बहुमुखी प्रत...
(काही फरक नाही)

२३:००, १ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

डॉ. जितेंद्र उधमपुरी (जन्म : उधमपूरजवळ, इ.स. १९४४) हे एक बहुमुखी प्रतिभेचे ्काश्मिरी लेखक व कवी आहेत.

आपल्या लहानशा खेड्यातच एका साध्या शाळेत उधमपुरींचेे शिक्षण झाले. गांधी मेमोरियल कॉलेज येथून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली, व डोगरी भाषेवर डॉक्टरेट केली.

कारकीर्द

डॉ. जितेंद्र उधमपुरी हे सुरुवातीला लष्करात नोकरीला होते. तेथे काही काळ काम केल्यानंतर ते आकाशवाणीत रुजू झाले. आयुष्यातील ३० वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या सेवेत घालवली व वरिष्ठ संचालक म्हणून निवृत्ती घेतली.

विविध भाषांत लेखन

डोगरी, हिंदी, उर्दू, पंजाबी, या भाषांवर उधमपुरी यांचेे प्रभुत्व असून या भाषांत त्यांनी ३० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, नेपाळी व चेक भाषांत अनुवाद झाले आहेत. 'The History of Dogri Literature' and 'The History of Dogra Culture' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत..

काव्यलेखन

जितेंद्र उधमपुरी हे आधुनिक डोगरी कवितेचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कवितांच्या शैलीत अनेक प्रयोग केले आहेत.

डॉ. जितेंद्र उधमपुरी यांनी लिहिलेली पुस्तके

  • जित्तो
  • दीवाने गज़ल
  • डुग्गरनामा
  • गीतगंगा, वगैरे

पुरस्कार

  • डॉ. जितेंद्र उधमपुरी यांना २०१५ सालचा अडीच लाख रुपयांचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. काश्मिरी साहित्याला मिळालेला हा बहुधा पहिलाच राष्ट्रीय सन्मान असावा.