"कोण म्हणतो टक्का दिला?" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: ’कोण म्हणतो टक्का दिला?’ हे संजय पवार यांनी इ.स. १९९२च्या सुमारास... |
No edit summary |
||
ओळ १:
’कोण म्हणतो टक्का दिला?’ हे संजय पवार यांनी इ.स. १९९२च्या सुमारास लिहिलेले एक नाटक आहे.
==नाटकाचे कथानक==
आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या आदेशाचं पालन करणं आराध्ये कुटुंबालाही भाग पडतं आणि त्यांच्या घरात कचर्या धीवार हा तरुण येतो. हा तरुण म्हणजे पुराणकथेतल्या देवयानीने ’तू विसाव्या शतकाच्या अखेरीस भूतलावर मागासवर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात जन्म घ्यायला लागेल’ असा शाप दिलेला कच असतो.
त्यानंतर त्या घरात जे काही काही घडते ते या नाटकाच्या रूपाने लेखक संजय पवार यांनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे.
|