"कृष्णनाथ शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. कृष्णनाथ शर्मा (जन्म : काशी, १ मे, १९३४; मृत्यू : जे.कृष्ण फाउ...
(काही फरक नाही)

१६:५९, ११ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

प्रा. कृष्णनाथ शर्मा (जन्म : काशी, १ मे, १९३४; मृत्यू : [[जे.कृष्ण फाउंडेशन परिसर, बंगलोर, ६ सप्टेंबर, २०१५) हे एक समाजवादी विचारवंत, बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि अर्थतज्‍ज्ञ होते. १९६१ मध्ये ते काशी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९९४ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.

डॉ. आचार्य नरेंद्रदेव यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रा. कृष्णनाथ हे १९५० साली समाजवादी आंदोलनात सामील झाले. डॉ. राममनोहर लोहिया यांचे ते एक सक्रिय सहयोगी होते. १९५६ मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी राजनारायण यांच्याबरोबर तुरुंगवास पत्करला होता. असेच सत्याग्रह व आंदोलने केल्याबद्दल त्यांना आयुष्यात एकूण सुमारे १३ वेळा तुरुंगात जावे लागले होते.

भारतातील सामान्य माणसाची रोजची कमाई

‘आम आदमी’च्या समस्यांविषयी नेहमीच चर्चा होते पण डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६४-६५ मध्ये संसदेत ‘आम आदमी’च्या कमाईवर चर्चा केली होती, त्यात त्यांनी ही कमाई दिवसाला तीन आणे असल्याचे सांगितले होते. हा आकडा त्यांना प्रा. कृष्णनाथ शर्मा यांनी काढून दिला होता. त्यापूर्वे ही कमाई १५ आणे आहे असे पंतप्रधान नेहरूंना वाटत होते.

कृष्णनाथ शर्मा हे ‘जन’, ‘मॅनकाइंड’ व ‘अंग्रेजी हटाव’ या नियतकालिकांचे संपादक होते. ब्रह्मविद्या परंपरेचे पाईक असलेले शर्मा हे ज्येष्ठ विचारवंत जे. कृष्णमूर्ती व दलाई लामा यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रापेक्षा हिंदी साहित्यिक म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते.

आयुष्याच्या अखेरच्या काळात कृष्णनाथांनी वैराग्य पत्करले होते; कर्नाटकमधील जे. कृष्णमूर्ती फाउंडेशन परिसरात त्यांचे शेवटचे वास्तव्य होते.

प्रा. कृष्णनाथ शर्मा यांनी लिहिलेली पुस्तके

  • अरुणाचल यात्रा (हिंदी)
  • इम्पॅक्ट ऑफ फॉरेन एड (इंग्रजी)
  • किन्नर धर्म लोक (हिंदी)
  • पृथ्वी परिक्रमा (हिंदी)
  • ‘बौद्ध निबंधावली (हिंदी)
  • लद्दाख में राग विराग (हिंदी)
  • स्पीति में बारिश (हिंदी)
  • हिमालय यात्रा (हिंदी)

कृष्णनाथ शर्मा यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • त्यांचे बौद्ध धर्माविषयीचे ज्ञान पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरव केला होता.
  • १९९२ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांना लोहिया पुरस्कार प्रदान केला.