"यशवंत कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
हैदराबाद येथेच एम. एन. रॉय यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांच्या विचारांनी यशवंत कानिटकर प्रभावित झाले व नंतर रॉयवादी बनले.
 
==भाषाविषयक कार्य==
चार भाषांवर प्रभुत्व असल्याने हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ते भाषांतरकार म्हणून रुजू झाले.
 
==मुंबईत बदली==
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर त्यांची बदली तत्कालीन 'मुंबई राज्या'त झाली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शासनाने सरकारी कारभाराची भाषा मराठी राहील, असे धोरण जाहीर केले. त्यासाठी प्रारंभी प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याच्या कामी यशवंत कानिटकर यांचे बहुमोल योगदान होते.
 
भाषा संचालनालय सुरू झाल्यानंतर राजभाषा मराठीविषयक धोरण राबविणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचार्‍यांसाठी मराठी भाषा परीक्षा आयोजित करणे, केंद्र राज्य अधिनियमांचा अनुवाद करणे अशी काहीशी क्लिष्ट कामे यशवंत कानिटकर करीत. नंतर ते भाषा संचालक झाले आणि या पदावर दीर्घ काळ काम करून सेवानिवृत्त झाले.