"आनंदऋषीजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
==पहिले प्रवचन==
आनंदऋषीजींनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिकून १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले. संस्कृत-प्राकृत बरोबरच त्यांना मातृभाषा मराठी, आणि इंग्रजी, उर्दू, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा उत्तम येत होत्या. गोड गळ्याची जन्मजात देणगी असलेल्या आनंदऋषीजींचे वक्तृत्व प्रभावी असल्याने त्यांच्या प्रवचनांची श्रोत्यांवर छाप पडे.
 
==जैन धर्म प्रचार==
आनंदऋषीजींनी पुढे रतनऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्‌) मॄतयूनंतरमॄत्यूनंतर आनंदऋषीजींनी त्यांच्या गुरुशिवायगुरूशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला.
 
==संस्थास्थापना==
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी तिलोक रत्‍न’तिलोकरत्‍न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाचीबोर्डा’ची स्थापना केली.
 
==आनंदऋषीजींची शिकवण==
धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र मानून सुमारे ७५ वर्षे देशभर भ्रमण करून हा संदेश त्यांनी दिला. भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे पोथ्यांत बंदिस्त होते, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आनंदऋषीजींनी केले. जैन धर्मग्रंथ आणि अन्य धर्मांची शिकवण यांची सांगड हे त्यांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अन्य धर्मांचा बारकाईने अभ्यास केला होता..त्यांच्या प्रवचनांमध्ये संत [[ज्ञानेश्वर]], संत [[तुकाराम]], [[नामदेव]], [[एकनाथ]]महाराजांबरोबर [[गुरुनानक]] इतकेच नाही तर महंमद पैगंबराची वचने यांचा समावेश असे; संत [[कबीर]], [[तुलसीदास]], [[नरसी मेहता]] यांच्या कवनांचाही उल्लेख असे.
धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोड्ण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र आहे.
 
आपलाच धर्म श्रेष्ठ्हा हेका त्यांनी कटाक्षाने टाळला. खुद्द जैन धर्मातील सर्व पंथांनी संघटितरीत्या धर्मकार्य करावे, मात्र त्याचा केंद्रबिंदू हा देशकार्याचा, सर्वसामान्यांच्या उत्थानाचाच असावा अशी त्यांची धारणा होती.