"हमीद गुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
==युद्धाची खुमखुमी==
हमीद गुल हे भारताला धडा शिकवायच्या वेडाने इतके झपाटलेले होते की, त्यांच्या डोक्यात भारताविरोधात अणुबॉम्ब कसा वापरता येईल याचेच डावपेच घोटाळत राहायचे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा म्हणजे त्याचा समाचार घेता येईल अशी इच्छा ते वारंवार बोलून दाखवत. त्यासाठीच ते सरहद्दीवर पुन्हापुन्हा दहशतवादी हल्ले आयोजित करत. भारत आणि पाकिस्तान यांच्यांत शांतता चर्चा सुरू झाली की, त्यांचे डोके फिरत असे आणि मग ते हाफिज सईदच्या मसलतीने भारतावर अतिरेकी हल्ल्याच्या नवनव्या योजना आखत असत.
 
==राजकारणी लोकांबद्दल तिरस्कार==
हमीद गुल यांना पाकिस्तानातील राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटे. निवडणुकीतून निवडून आलेले सरकार टिकू नये यासाठी त्यांची सतत धडपड असायची. पाकिस्तानी लष्कर हे राजकारण्यांच्या हाताखाली कधीही काम करणार नाही असे ते जाहीरपणे सांगायचे. पाकिस्तानात लष्करी राजवट आली की, त्यांना आनंद व्हायचा.
 
जनरल मुशर्रफ लष्करी उठाव करून सत्तेवर आले तेव्हा त्यांना आपणच सत्तेवर आलो आहोत असे हमीद गुल यांना वाटले. ते आनंदाने मुशर्रफ यांना भेटायला गेले आणि त्यांनी मुशर्रफना सांगितले की, आता तुम्ही फक्त सत्तेचा आनंद घ्या. मी सत्ता राबवतो, तुम्ही निश्चिंत रहा. मला फक्त पंतप्रधान करा आणि बघा. पण मुशर्रफ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.हे कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यांनी हमीद गुल यांना सत्तेच्या वळचणीलाही उभे केले नाही. त्यामुळे हमीद गुल यांचा जो काही संताप झाला, तो त्यांच्या मृत्यूपर्यंतही संपला नव्हता.
 
==आधी रशियाविरोध मग अमेरिकाविरोध==
हमीद गुल हे ओसामा बिन लादेन आणि तालिबानचे कट्टर समर्थक होते. ओसामा बिन लादेनशी त्यांचा थेट संपर्क होता. अफगाणिस्तानात सोविएतविरोधी लढ्यासाठी तालिबानला तयार करण्यातही त्यांचा मोटा वाटा होता. त्याकाळी अमेरिकेलाही हमीद गुल यांचा मोटा आधार वाटायचा. पण अफगाणिस्तानातून सोव्हिएट सेना निघून गेल्यानंतर हा आधार अमेरिकेवरच उलटला. नंतरच्या काळात ते इतके अमेरिकाविरोधी झाले की, काही काळ ते अमेरिकेच्या हिटलिस्टवर गेले आणि त्यांना अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने घरात दडून बसावे लागले होते.
 
==दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार==
==निवृत्ती==
मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचे सर्व नियोजन हमीद गुल यांनीच केल्याचे सांगण्यात येते.
हमीद गुल हे आयएस‌आयच्या प्रमुखपदावरून [[इ.स. १९८९]] रोजी निवृत्त झाले.
 
हमीद गुल यांच्यावर पाकिस्तानचे भूतपूर्व लष्करशहा झिया उल हक यांचा मोठा प्रभाव होता. किंबहुना ते त्यांच्याच तालमीत तयार झाले होते. हमीद गुल हे बटालियन कमांडर असताना झिया उल हक हे त्यांचे वरिष्ठ होते. त्यामुळे झिया लष्करात जसजसे वर चढत गेले, तसे हमीद गुलही वर चढत गेले.
 
भारतातील पंजाब राज्यातल्या दहशतवादाला खतपाणी घालण्यात गुल यांनी त्याकाळी डिव्हिजनल कमांडर या नात्याने मोटी कामगिरी बजावली.
 
हमीद गुल १९८७मध्ये आयएसआयचे प्रमुख झाले तेव्हा सुदैवाने पंजाबातील दहशतवाद भारताने संपुष्टात आणला होता. पण त्यांनी काश्मिरातील दहशतवादाला खतपाणी घातलेच. पुढे सत्तेवर आलेल्या लोकशाही सरकारांनी त्यांच्या उपद्‌व्यापामुळे त्यांना बिनमहत्त्वाची वाटणारी पदे दिल्यामुळे त्यांनी लष्करातून निवृत्ती पत्करली. त्यानंतर ते भारतविरोधी भाष्यकार म्हणून नावारूपाला आले. याच काळात त्यांनी दहशतवादी संघटनांना मदत करणारी यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली.
 
==मृत्यूनंतरही भारतविरोध जिवंत==
हमीद गुल मरण पावले, तरी त्यांनी निर्माण केलेली पाकिस्तानातील भारतविरोधी प्रवृत्ती येता आणखी काही काळ तरी तशीच जिवंत राहण्याची शक्यता आहे, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे..
 
[[वर्ग:पाकिस्तान]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हमीद_गुल" पासून हुडकले