"विनायक जनार्दन करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९:
विनायकांनी विपुल कविता लिहिलेली आहे. राष्ट्रभक्तिपर कविता, प्रणयरम्य कविता, वीररसयुक्त कविता, हिरकणी, अहल्या, पन्ना, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा यांच्यासारख्या वीरांगनांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारी कविता वगैरे.
विनायकांच्या कविता काव्यरत्नावली, मनोरंजन,करमणूक या नियतकालिंकांमधून प्रकाशित होत. त्यांच्या कवितांचे पुस्तक मात्र त्यांच्या मृत्यूनंतर छापले गेले. दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ [[अनंततनय]] हे विनायकांच्या कवितासंग्रहाचे पहिले संपादक. त्यांनी अनेक नियतकालिकांमधून विखुररलेल्या एकूण ७३ कवितांचा संग्रह प्रकाशित केला. या पुस्तकाला [[वा.ब. पटवर्धन]] यांची प्रस्तावना होती. इ.स. १९४७ साली या पुस्तकाची ३री आवृत्ती निघाली. ४थ्या आवृत्तीत (१९५४, पुनर्मुद्रण १९६०) एकूण ८५ कविता असून त्या पुस्तकाला प्रा. [[भवानी शंकर पंडित]] यांची विवेचक प्रस्तावना आहे. त्यांनी विनायकांचा मराठीतील राष्ट्र्रीय कवितेचे पहिले व श्रेष्ठ उद्गाते असा गौरव केला आहे.
कवी विनायकांनी प्रभावती नावाचे एक नाटक लिहिले होते. प्रासादिक नाट्यकलाप्रवर्तक संगीत मंडळीने ते रंगभूमीवर आणण्याची तयारी केली होती, परंतु ज्वलंत राष्ट्रवादचा पुरस्कार करणारे असल्याने त्या नाटकाचा प्रयोग होऊ शकला नाही.
Line १६ ⟶ २०:
{{DEFAULTSORT:करंदीकर,विनायक जनार्दन}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९०९ मधील मृत्यू]]
|