"अनंततनय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
अनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे (जन्म : बडनेर भोलजी-जिल्हा बुलढाणा, इ.स. १८७५; मृत्यू : पुणे, ११ जून, इ.स.. १९२९) हे एक मराठी कवी होते. ह्यांचे मूळ गाव [[जुन्नर]]. स्कूल-फायनलपर्यंत शिकल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे १२ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्या काळात तेथील सत्पुरुष चंडिराममहाराज यांचे पद्यमय चरित्र त्यांनी लिहून प्रसिद्ध केले (१८९९) अनंततनय यांची बरीचशी कविता पुण्याच्या चित्रमयजगत्मधून प्रसिद्ध झाली आहे.
इ.स. १९२०मध्ये पुणे येथे कवी आणि काव्यरसिक यांच्यासाठी स्थापन झालेल्या ’श्री महाराष्ट्र शारदामंदिरा’चे ते आधारस्तंभ होते. ह्या संस्थेच्या वतीने नवीन कवितेविषयी समाजात आवड निर्माण करणे, कवींच्या काव्यकृती प्रकाशित करणे, कवीची चरित्रविषयक माहिती मिळवून ती प्रसिद्ध करणे, काव्यग्रंथाछा संग्रह करणे, कविसंमेलने भरवणे, काव्यविषयक चर्चा घडवून आणणे, असे विविध उपक्रम अनंततनय यांनी केले.
==काव्य रचना==
Line १३ ⟶ १४:
मराठी भाषेची संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा मोडून इतर विषयांवरील काव्यरचनेस नवकाव्य म्हटले जाते. कवी [[कृष्णाजी केशव दामले|कृष्णाजी केशव दामले]] (केशवसुत) यांना मराठीच्या नवकवितेचे सुरुवात केली म्हटले जाते. रविकिरण मंडळीतील कवींनी कविता समाजाभिमुख केली मात्र त्यांचे समकालीन अनंततनय यांचा नवकवितेला आणि रविकिरण मंडळींना कडाडून विरोध केला असे .अवलोकन भावकवी यशवंत डॉ.सोमनाथ कोमरपंत यांनी केले आहे.
==अनंततनय
* कवी [विनायक|विनायकांच्या]] कविता (१९२४)
* काही संस्कृ्त काव्यग्रंथांचा अनुवाद आणि संपादन
* ना.म. भिडे यांच्या ’काव्यचर्चा’ ग्रंथ (१९२५)
==अनंततनय यांचे काव्यसंग्रह==
* झोपाळ्यावरची गीता (पहिली आवृत्ती १९१७)
* तिलकविजय(लोकमान्य टिळकांचे ओवीबद्ध चरित्र, पूर्वार्ध १९२८)
* पुण्याची पर्वती (पोवाडा -१९२०)
* शारदा-दूतिका (मेघदूताच्या धर्तीवरचे विनोदी काव्य पूर्वार्ध १९१३; उत्तरार्ध १९१४) या काव्यात त्यांनी आधुनिक कवींवर विनोदी भाषेत टीका केली आहे.
* हृदयतरंग, तीन भाग, अनुक्रमे १९१५, १९२० व १९२६)
==संदर्भ==
|