[[Image:Gudhi.jpg|400पक्ष|उजवे]]
[[गुढीपाडवा]] या [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीयांच्या]] सणाच्या दिवशी '''गुढी'''(तेलगु:గుఢీ) उभारली जाते (म्हणून नाव गुढीपाडवा). '''गुढी''' किंवा [[ब्रह्मध्वज]] ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच [[बांबू|बांबूपासून]] तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला [[रेशमी कापड]], [[कडुलिंब]], फुलांचा हार आणि [[साखर|साखरेचीसाखरेच्या पदकांची]] माळ बांधून(तिला त्यावरगाठी धातूचेम्हणतात) भांडे,बांधून सहसात्यावर तांब्या बसविला जातो. गुढी नंतर [[पाट|पाटावर]] किंवा तांदुळाने भरलेल्या एका कलशात उभी केली जाते.
==गुढी शब्दाचा अर्थ==
{{मुख्यलेख|काठी पूजा}}
[[काठी पूजा]] आणि [[देवक-स्तंभ]] परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरांपैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखीतलिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर<ref>खाप्रे.ऑर्ग</ref> "गुढयागुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.
हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभेकरूनउभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ग चा क (अथवा क चा ग) होऊ शकतो हिही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षीणेतलीदक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ ईंडियाइंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेलाबनवलेले वस्ती प्रकारा करताघर, नावहे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहन पुर्वशालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहीलाराहिला असण्याची शक्यता असू शकते.
==महाराष्ट्रीय गुढीचे लिखीतलिखित साहित्यिक संदर्भ==
इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचीतरचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेवजी नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाणइनिर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनातलेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं , वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.
आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्वाचामहत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंतिविनंती मान्य करणें, संमतिसंमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंतिविनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास तेअसल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महपूर्णमहत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) ठरत असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्याकेल्यानंतर, नंतरया गुढीचे अजून एक वैशीष्ट्य या गुढीचेवैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्याजाणार्या समूहासमूहांतील पैकीएखादा चपळ माणूस पाहून त्याकडे हिही गुढीची काठी दिली जात असे. 4529तुकाराम गाथेतगाथेतील संत तुकारामतुकारामांच्या त्यांच्या४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥॥२॥"
===संत एकनाथ साहित्यातील गुढीगुढीचा उल्लेख===
संत एकनाथ (१५३३–१५९९)
|