"वसुंधरा कोमकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
वसुंधरा श्रीखंड्यांच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. त्यांची आई कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील अॅक्टिव्ह होती, तर त्यांचा मोठा भाऊ मनोहर हौशी नाटकवेडा आणि संगीतवेडा होता. खत्यांची बहीण प्रभा दिलरुबा वाजवायची; तर धाकटा भाऊ तबला. वसुंधराबाईंचे गाणेही कलकत्त्यातच आकाराला आले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या 'ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स'सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या होते आणि त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणून त्यांना चांदीची छोटी तंबोरी मिळाली होती.
या पुरस्काराचा फायदा असा झाला की,. कलकत्ता आकाशवाणीवरील बुजुर्ग रेडिओ कलावंतांच्या संपावेळी संगीतसभेत गायलेल्या बालगायकांनाच बोलावले गेले. त्यात वसुंधराबाईंची वर्णी लागली आणि त्या लहान वयातच रेडिओ आर्टिस्ट बनल्या.
==मुंबईत आगमन==
१९४२ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. कलकत्ता हे ब्रिटिशांचे मुख्य केंद असल्यामुळे तिथे युद्धाचे वारे वाहू लागले. कलकत्त्यातील अनेक मराठी कुटुंबे पुन्हा महाराष्ट्रात परतली. वसुंधरा श्रीखंड्यांचे कुटुंबही १९४५-४६च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमारांचे सतत संगीताचे दौरे चाललेले असत. मग देवधरमास्तरांनीच त्यांना शिकवायला सुरुवात केली. मुंबईत असतील तेव्हा कुमारजीही शिकवयाचे. पण मुंबईच्या मुक्कामात
|