"जी.एन. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २०:
| जोडीदार =
| अपत्ये =
| नातेवाईक = गायक अभिजित ताटके (नातू)
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
ओळ ४१:
 
'''{{लेखनाव}}''' हे [[मराठी भाषा|मराठी]] आद्य भावगीत गायक होते. [[सप्टेंबर २२]], [[इ.स. १९९४|१९९४]] रोजी त्यांचे निधन झाले. ’रानारानात गेली बाई शीळ’ हे त्यांचे आणि मराठीतले पहिले भावगीत.
 
जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्ही (हिज मास्टर्स व्हॉईस रेकॉर्ड कंपनी)मध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्याच, पण त्या हूरहूर लावणार्‍या भावगीताच्या काळाचे ते खरे जनक होते.
 
एचएमव्हीत रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रूपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली.
 
एचएमव्हीत ४० वर्षे जी.एन. जोशी यांनी हे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी.एन. जोशी हे यांना दादा अधिकारी का म्हणत याचा अंदाज रसिकांना येईल.
 
==पहिले भावगीत==
‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत [[मेहेकर]]चे कवी [[ना.घ. देशपांडे]] यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.
 
इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफन खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.
 
==जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते==
* अशी घालं गळा मिठी बाळा
* आकाशीच्या अंतराळी (कवी - [[अनिल]])
* आमराईत कोयल बोले (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला
* एकटीच भटकत नदीकाठी
* कन्हैय्या दिसशी किती साधा (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* चल रानात साजणा (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* चकाके कोर चंद्राची (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगू [[हनगळ]]). कवी - [[स.अ. शुक्ल]]
* जादुगारिणी सखे साजणी (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* झुळझुळ वाहे चंद्रभागा (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको (कवी [[ना.घ. देशपांडे]]).हे गाणेपुढी [[सुधीर फडके]] यांच्याही आवाजात ध्वनिमुद्रित झाले.
* डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका (कवी [[भा.रा. तांबे]]. हे गाणे पुढे [[लता मंगेशकर]] यांनीही गायले. त्याचे संगीत [[वसंत प्रभू]] यांचे होते.
* तू तिथे अन मी इथे हा (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगू [[हनगळ]]). कवी - [[स.अ. शुक्ल]]
* देव माझा तू कन्हैय्या (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* नज सोडवे पदाला
* नदीकिनारी, नदीकिनारी गं (कवी [[ना.घ. देशपांडे]])
* प्रिय जाहला कशाला (कवि.- [[वि.द. घाटे]])
* ‘प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी
* मंजूळ वच बोल सजणा (सहगायिका लीला लिमये). कवी - [[स.अ. शुक्ल]]
* माझ्या फुला उमल जरा (कवि.- [[वि.द. घाटे]])
* या तारका सूर बालिका (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* राया येता जवळ मनमोहना (कवी - [[स.अ. शुक्ल]])
* विसरून जा (कवी - [[अनिल]])
 
==जी.एन. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक==
* स्वरगंगेच्या तीरी (आत्मचरित्र)
 
==कॉम्पॅक्ट डिस्क्स==
* एचएमव्हीने जी.एन.जोशींच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ गाण्याच्या दोन सीडीज काढल्या आहेत, त्या सीडीजचेही नाव ’स्वरगंगेच्या तीरी’ असे आहे.
 
==जी.एन. जोशी यांच्यावरील माहितीपट==
* स्वरगंगेचा साधक (माहितीपट)
 
== बाह्य दुवे ==