"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''गौतम बुद्ध'''( [[रोमन लिपी]]:Siddhārtha Gautama [[संस्कृत]]: सिद्धार्थ गौतम [[पाली]]: सिद्धार्थ गौतम )
बुद्ध धर्माचे संस्थापक. बौद्ध मतानुयायी याला वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. त्याच्या जन्माचा व मृत्यूचा नेमका काळ निश्चितपणे सांगता येत नाही. विसाव्या शतकातल्या इतिहासकारांच्या मते, इ.स.पू. ५६३ ते इ.स. पू. ४८३ हा त्याचा जीवन काळ. अलीकडील काळातील संशोधक विद्वानांनी ठामपणे व्यक्त केलेल्या मतानुसार, बुद्धाच्या मृत्यूचा सन इसवी पूर्व ४०० च्या जवळ पास असावा.
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) -हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्याची जीवनकहाणी, त्याची प्रवचने, आणि त्याने घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून अनुयायांनी त्याच्या महापरीनिर्वाणानंतर संकलित केले आणि मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केले . गौतमबुद्धाच्या मानल्या जाणाऱ्याजाणार्‍या विविध शिकवणुकी पाठांतराद्वारे एका पिढीकडून दुसऱ्यायादुसर्‍याया पिढीकडे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
 
[[चित्र:Gandhara Buddha (tnm).jpeg|thumb|upright|[[गांधार]] बुद्ध. इ.स.१-२ रे शतक, [[टोक्यो]],जपान राष्ट्रीय संग्रहालय]]
 
== जीवनपट ==
सिद्धार्थ गौतम विषयीच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे [[बौद्ध वाङ्मय]]. बुद्ध आणि त्याचे अनुयायी प्रत्येक वर्षी चार महिने त्याच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि मग एका शतकानंतर, अनुयायांनी एक [[बौद्ध धम्म परिषद]] (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, मौखिक जतनाने हा ऐतिहासिक ठेवा पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिला. उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्यादुसर्‍या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धाची शिकवण लेखी रुपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.
सिद्धार्थ गौतम विषयीच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे [[बौद्ध वाङ्मय]]. बुद्ध आणि त्याचे अनुयायी प्रत्येक वर्षी चार महिने त्याच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि मग एका शतकानंतर, अनुयायांनी एक [[बौद्ध धम्म परिषद]] (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, मौखिक जतनाने हा ऐतिहासिक ठेवा पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिला. उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धाची शिकवण लेखी रुपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.
एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, बुद्ध जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमाध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.
 
Line २६ ⟶ २५:
 
== गृहत्याग आणि तपस्या ==
लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या -चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्याखर्‍या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्ऱ्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्यासार्‍या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या मर्यादित जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंथक नामक घोड्यासह उभा होता. देवगणांनी कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते.
 
सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.
 
ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्याबाळगणार्‍या सिद्धार्थाने त्या दोघांस ही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला.
 
सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली.या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला.
Line ४० ⟶ ३९:
 
[[चित्र:BuddhaYun Gang Temple.jpg|thumb| सोन्याची बुद्ध मूर्ती]] या मूर्तीचा शोध नंदकिशोर भालेराव याने लावला
 
==पुस्तके==
गौतम बुद्ध आणि त्याचा धर्म यांविषयी अनेक्पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही -
* गौतमबुद्धावे चरित्र (लेखक [[कृष्णराव अर्जुन केळूसकर]], १८९८)
* धम्मचिकित्सा (लेखक राजाराम नारायण पाटकर, १९३२)
* बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (लेखक [[चिं.वि. जोशी]], १९६३)
 
 
== संदर्भ ==