'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १९]],[[इ.स. १९१७]] - [[ऑक्टोबर ३१]],[[इ.स. १९८४]]) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
[[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या लढाईवेळीप्राप्तीसाठी त्यांना [[मोरारजी देसाई]] यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी [[पोखरण]] येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
इंदिराजींचाइंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|राष्ट्रीय काँग्रेसमध्ये]] प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्रीनभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. शास्त्रीजींचालालबहादुर शास्त्री यांचा [[ताश्कंद]] येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज यानीयाच्या पाठिंबापाठिंब्याने देऊन ३५५१८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी , [[ऑपरेशन ब्लू स्टार|ऑपरेशन ब्ल्यू स्टार]] या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेतूनसत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.
== बालपण ==
[[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल]] आणि [[कमला नेहरू|कमला]] या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे [[काश्मिरी पंडित]] होते. इंदिरांचे आजोबा [[मोतीलाल नेहरु]] व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरुनेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करूनकरणे यातवगैरे आपलेगोष्टी योगदानही दिलेसेना करीत असे.
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरुनेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षणहीशिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://news.bbc.co.uk/local/oxford/hi/people_and_places/arts_and_culture/newsid_8661000/8661776.stm|शीर्षक=Oxford University's famous south Asian graduates |प्रकाशक=बीबीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ ऑक्टोबर, २०१२}}</ref> याच दरम्यान त्या लंडन स्थितलंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून मुक्तीबरे साठीहोण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख [[फिरोज गांधी]] या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्यांनीत्या दोघांनी विवाह केला.
== फिरोज गांधींसोबत विवाह ==
भारतात परतताच त्यांनी फिरोज गांधींसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीं सुद्धागांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तरप्रदेशातूनउत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. त्यांनाया दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा येत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदय विकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्युमृत्यू झाला.
== राजकारणातला प्रवास ==
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला. आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
'''माहिती व नभोवाणीमंत्रीनभोवाणी मंत्री:'''
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर [[लाल बहादूर शास्त्री]] पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या [[मद्रास]] राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्नप्रयत्न केला. [[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५ चे भारत-पाक युद्ध]] या दरम्यान त्या [[श्रीनगर]] च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा [[दिल्ली]] येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
[[पाकिस्तान|पाक]]चे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद]] येथे पाकिस्तानचे [[अयुब खान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिलापहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
== पंतप्रधान ==
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याझाल्याझाल्या तरी काँग्रेस मध्येकाँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
== १९७१ चे भारत पाक युद्घ ==
मुख्य पानः [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध]]<br />
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली., पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
==इंदिरा गांधी यांची चरित्रे==
* मदर इंडिया (मूळ इंग्रजी लेखक प्रणय गुप्ते, मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)
.
{{क्रम|
मागील= [[चरणसिंग चौधरी]]|
|