"दत्तात्रय अंबादास मायाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. विदर्भातील [[अमरावती]] जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला. मधुचंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे ते सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी मित्र फाउंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे (फेब्रुवारी २०१५).
 
राजदत्त अर्थात दत्ताजी मायाळू हे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक [[राजा परांजपे]] यांचे शिष्य. तरुण वयात नोकरीच्या शोधात दत्ताजी मद्रासला गेले होते. तिथे त्यांना 'चांदोबा' या मुलांच्या मासिकाच्या संपादकाची नोकरी मिळाली. [[राजा परांजपे]] यांना मदासच्या चित्रपटाची ऑफर आल्यामुळे ते तिकडे गेले तेव्हा मराठी समजणारा असिस्टंट हवा म्हणून त्यांनी दत्ताजींना सहायक दिग्दर्शक म्हणून घेतले. राजदत्ता यांच्या विषय निवडीपासून ते काम करण्याच्या पद्धतीवर [[राजा परांजपे]] यांचा प्रभाव पडलेला दिसतो.
 
मधुचंद्र या राजदत्त यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. 'गोट्या' ही सुंदर टीव्ही मालिका त्यांनी बनवली. त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील मालिकाही उत्तम होती. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे ते सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी मित्र फाउंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे (फेब्रुवारी २०१५). राजदत्त यांना गदिमा पुरस्कार, २०१४सालचा वाग्‌यज्ञे कला गौरव पुरस्कार, संस्कृती कलादर्पण सर्वश्रेष्ठ कलागौरव सन्मान आदींनीही सन्मानित करण्यात आले आहे.
 
राजदत्त यांचे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेली चित्रपट कथेबद्दलची विलक्षण समज. आपला मुद्दा ते शांतपणे, अनाग्रही राहत तरीही प्रभावीरीत्या समजावून देतात. त्यांच्या साधेपणाचेही अनेकांवर दडपण येते. दुसरी त्यांची खासीयत म्हणजे सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना असलेली कमालीची आस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीचे ते अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या ठायी अभिनिवेश कधीच नसतो. वनवासी कल्याण आश्रमशाळांसाठी ते ज्या तळमळीने फिरतात, मुलांमध्ये काम करतात ते पाहून यांना चित्रपटक्षेत्र अधिक प्यारे आहे की समाजसेवा असा प्रश्न पडतो. त्यांना गदिमा पुरस्कार मिळणे म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पुरस्कार जाणे आहे.
 
;गाजलेले चित्रपट: