"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९:
आळेकरांचा जन्म [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] झाला. त्यांची आई म्हणजे [[काकासाहेब गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्यात]] झाले. [[इ.स. १९७२]] साली ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] एम.एस्‌सी. झाले.
 
शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्याछे मामा [[काकासाहेब गाडगीळ]] यांच्यामुळे काँग्रेस, [[साप्ताहिक साधना|साधना]] कार्यालयाजवळ घर असल्याने [[राष्ट्र सेवा दल]] आणि शेजारेच मोतीबाग असल्याने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघविचार]] असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.
 
शाळकरी वयात शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होतं. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले..
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची सुरुवात केली. थिएटर अॅकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर' , 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात केले. कै. पं. [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
 
== कारकीर्द ==
फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.
 
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर अॅकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेच्या माध्यमातूनसंस्थेने रंगमंचावर आलेल्याआणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर' , 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात केले. कै. पं.पंडित [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
 
जानेवारी २०१५मध्ये, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ’नाटककार सतीश आळेकर’ या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू [[नागनाथ कोत्तापल्ले]] आणि नाटककार [[दत्ता भगत]] यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
 
== नाट्यसंपदा ==
== कारकीर्द ==
{| class="wikitable sortable"
|-