"पुरुषोत्तम पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. पुरुषोत्तम पाटील (जन्म : धुळे, १९२७) हे एक मराठी कवी आहेत. कवय... |
No edit summary |
||
ओळ ३:
कवयित्री [[सरिता पदकी]] या महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम पाटील त्यांचे सहाध्यायी होते. [[सरिता पदकी|सरिताबाईंच्या]] कविता पुरुषोत्तम पाटील यांनी स्वहस्ते उतरवून काढून, ’साहित्य’, ’अभिरुची’ आणि ’सत्यकथा’ या तीन प्रतिष्ठित नियतकालिकांकडे पाठवल्या होत्या. त्या तिन्हीकडेही प्रसिद्ध झाल्या, आणि [[सरिता पदकी]] यांना साहित्यवर्तुळात थोडे स्थान मिळाले.
पुरुषोत्तम पाटील यांनी काव्यलेखनाची प्रेरणा [[बा.भ. बोरकर|बोरकरांसारख्या]] थोर कवींकडून घेतली असली तरी त्यांची कविता कुठेही अनुकरणाच्या किंवा कुठल्याही प्रथेच्या आहारी गेलेली नाही. पुरुषोत्तम पाटील हे एक अत्युच्चदर्जाचे कवी आहेत, असे [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रजांनी]]
इ.स. 982 मध्ये ‘सत्यकथे’चा अस्त झाला.होता. आणि केवळ साहित्य या विषयाला वाहिलेली लघुनियकालिके फार मोठा पल्ला गाठू शकली नव्हती. हे जाणून, पुरुषोत्तम पाटील यांनी कै. [[बा.भ. बोरकर]] यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेले एक ’कविता- रती’ नावाचे द्वैमासिक सुरू केले. या नियतकालिकाचा पहिला अंक [[धुळे|धुळ्याहून]] ३० नोव्हेंबर १०८५ रोजी प्रसिद्ध झाला.
पुरुषोत्तम पाटील हे स्वत:च कवी असल्यानं त्यांच्या मनात कवितेसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी होतीच. शिवाय ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाच्या संपादनाचा अनुभव गाठीशी होता. या भांडवलावर केवळ ‘काव्य आणि काव्यसमीक्षा’ यांना वाहिलेल्या नियतकालिकाला त्यांनी प्रारंभ केला. वाङ्मयीन नियतकालिकाचा डोलारा सांभाळताना करावी लागणारी सर्वप्रकारची कसरत ते आजतागायत करत आहेत. ‘कविता- रती’साठी कोणत्याही प्रकारची शासकीय मदत वा अनुदान त्यांनी घेतलेलं नाही. वर्गणीदार आणि असंख्य हितचिंतक यांच्या बळावर हे नियतकालिक सुरू आहे (इ.स. २०१५).
==पुरुषोत्तम पाटील यांचे कवितासंग्रह==
* तळ्यातल्या साउल्या
* तुकारामाची काठी
* परिदान
[[वर्ग:मराठी कवी]]
|