"मराठी चित्रपटांचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{विकिकरण}}
{{मुख्य|मराठी चित्रपटसृष्टी}}
सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही भारतीय चित्रपट व्यवसायाचा जो विकास झाला, त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये मराठी चित्रपट 'पुंडलीक'चे चित्रीकरण याच शहरी झाले. [[दादासाहेब फाळके]] - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी [[राजा हरिश्चंद्र]] या, भारतीय सिनेइतिहासातील मैलाचा टप्पा ठरणाऱ्यापहिल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथेच केले. १९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत [[मुंबई|मुंबईच]] [[भारत|भारतीय]] सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच [[पुणे]], [[खडकी]], [[कोल्हापूर]], [[नाशिक]] या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांच्या उत्कृष्ट `सेट्स‌' मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांचा [[सैरंध्री]] हा एतद्‍देशीय चित्रपटकलेतील एक लक्षणीय टप्पा आहे.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथांसारख्या विषयांबरोबरच मराठ्यांच्या इतिहासातील घटनाप्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्या हे विषयही चित्रपटांच्या कथानकांसाठी निवडले गेले. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे [[महाराष्ट्र फिल्म कंपनी]] चा ऐतिहासिक चित्रपट [[सिंहगड]] (१९२३) आणि त्याच कंपनीचा सामाजिक चित्रपट [[सावकारी पाश]] (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन [[बाबूराव पेंटर]] यांचेच आहे. 'सिंहगड'मध्ये तानाजीच्या आणि शिवाजीच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीची कथेचे चित्रण आहे. तर 'सावकारी पाश'मध्ये गरीब मराठी शेतकऱ्याच्याशेतकर्‍याच्या सावकाराकडून होणाऱ्याहोणार्‍या पिळवणुकीचे. हा चित्रपट [[सत्यजित राय]] यांच्या '[[पाथेर पांचाली]]'च्या चाळीस वर्षे आधी काढला गेला असून त्यातील तत्कालीन परिस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. या चित्रपटाला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकऱ्याचीशेतकर्‍याची भूमिका करणारे [[व्ही. शांताराम]] पुढे एक श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. [[बाबूराव पेंटर]] यांनी आणखी दोन ऐतिहासिक मूकपटांची निर्मिती केली. [[नेताजी पालकर]] (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या दुसऱ्यादुसर्‍या चित्रपटाचे मूळ नांव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरुन ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात शिवाजीच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.
 
==मराठी चित्रपटांचे आठवड्यांचे विक्रम==
{| class="wikitable sortable"
|-
! चित्रपटाचे नाव
! आठवडे
! चित्रपटगृह
|-
|सांगत्ये ऐका (१९५९)
|१३१
|विजयानंद (पुणे)
|-
|पिंजरा (१९७२)
|>५०
|प्लाझा (मुंबई)
|-
|पिंजरा
|२५
|सेन्ट्रल (मुंबई)
|-
|
|
|
|-
|}
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट|मराठी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:चित्रपट]]