"अनंत अंतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ९:
 
१९३८ सालामध्ये अनंतरावांवर सत्यकथा मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी ते केवळ २७ वर्षांचे होते. सत्यकथेचे कार्यकारी संपादक म्हणून काम करताना त्यांनी अनेक नवीन लेखकांना संधी दिली. त्यांतले [[अरविंद गोखले]], [[दि.बा. मोकाशी]], [[जी.ए. कुलकर्णी]] हे लेखक पुढे मराठी साहित्याच्या क्षेत्रात नामवंत झाले.
 
==हंसचा जन्म==
पुढे, १९४२ सालात, अनंतरावांनी सत्यकथा सोडली आणि ते वसंत मासिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले. परंतु तिथे त्यांचे मतभेद होऊ लागले आणि मग स्वतंत्र बाण्याच्या अनंतरावांनी स्वतःचच मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते गिरगावातल्या गोरेगावकर चाळीत राहात होते. समोरच मौज-सत्यकथा यांचे कार्यालय होते. त्या नियतकालिकांनी स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले होते. त्यांचा असा एक खास वाचकवर्ग तयार झाला होता. अशावेळी त्या नियतकालिकांच्या कार्यालयाजवळूनच नवे मासिक सुरू करण्याचा अनंतरावांचा निर्णय धाडसीच होता. परंतु स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असणार्‍या अनंतरावांनी ते साहस केलेच, आणि ते विलक्षण यशस्वीही करून दाखवले.
 
त्यांच्या 'हंस' या मासिकाच्या पहिल्याच अंकात [[न.चिं. केळकर]], [[पु.भा. भावे]], [[बी. रघुनाथ]], [[चिं.वि. जोशी]], [[वि.सी. गुर्जर]], [[अ.वा. वर्टी]], [[जी.ए. कुलकर्णी]], [[बा.द. सातोस्कर]], [[वा.ग. तळवलकर]] अशा नामवंतांनी लेखन केले होते.
 
==हंस-मोहिनी-नवल==
थोड्याच काळात 'हंस' अतिशय लोकप्रिय झाले.त्यानंतर चार वर्षांनी (१९५० साल) अनंतरावांनी 'मोहिनी' आणि नंतर 'नवल' (१९५४ साल) ही मासिके सुरू केली. १९५४मध्ये त्यांनी मुंबईतून आपला मुक्काम पुण्यात हलवला.
 
==पानशेतचे संकट आणि त्यातून बाहेर ==
त्यांची मासिके जोरात चालू असतानाच १९६१च्या पानशेतच्या पुरात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. छापखान्यातली यंत्रेर कामातून गेली. हजारो रुपयांच्या कागदाचा पुराच्या पाण्याने लगदा केला आणि हस्तलिखितांची पार वाताहत करून टाकली. त्यांच्या राहत्या घराचीही अवस्था बिकट झाली. कोणाचाही धीर सुटावा असेच ते नुकसान होते. परंतु विपरीतापुढं नमून जाणे हा अनंतरावांचा पिंड नव्हता. आपल्याला हवी तशी परिस्थिती घडविण्याची विलक्षण जिद्द त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ते त्या संकटातून बाहेर आले; त्यांची तीनही मासिके पुन्हा डौलाने विहार करून रसिकांना वाचनानंद देऊ लागली.
 
त्या काळात अनेक लेखकांनी त्यांना धीर दिला, सांत्वन केले. माणुसकीचा हात पुढे केला. [[पु.ल. देशपांडे]] यांनी पत्र लिहिले, 'प्रिय अंतरकर, फक्त एका ओळीत तुम्ही सर्वजण सुखरूप आहात एवढे कळवावे. माझी काळजी दूर होईल.' अनेक लेखकांनी आपल्याला मानधन पाठवू नये, असे कळवले. पण त्या काळातही अनंतरावांनी कोणाचेच साहित्य मानधनाविना प्रसिद्ध केले नाही.
 
==वाचनाची आवड==
इंग्लिश-मराठी साहित्य हा अनंतरावांचा श्वास होता. अभिजात चित्रपट हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. इंग्लिश-मराठी समीक्षावाङ्मयाचे सातत्यानं परिशीलन करणं हा त्यांचा ध्यास होता. विविध लेखकांच्या शैलीचा वेध घेणं आणि त्यावर चिंतन करणं हा त्यांचा स्वभावधर्म होता. बागकाम करणे हा त्यांचा विरंगुळा होता. नाटक, सर्कस आणि जादूचे प्रयोग याबद्दल त्यांच्या मनात एक विलक्षण ओढ होती. इंग्लिश-मराठीतील दुर्मीळ आणि अभिजात ग्रंथांचा संग्रह त्यांच्याकडे होता.आपली दर्जेदार नियतकालिके आणि साहित्यिक परिवार हीच त्यांची संपत्ती होती. अशा विविध पैलूंचा धनी असणार्‍या अनंतरावांकडे जाहिरातदारांच्या मनमानीला झुगारून टाकण्याची जिद्द होती. त्यांच्या संपादनकौशल्यानं मराठी साहित्य अधिकच समृद्ध केलं.