"ऐश्वर्य पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
== जीवन ==
 
ऐश्वर्य पाटेकरचानामदेव पाटेकर यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील पाटे या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. नामदेव आणि इंदूबाई या दांपत्याला ऐश्वर्य हा मुलगा आणि चार मुली होत्या. आपल्या वडिलांकडून आईला होणारी मारहाण आणि तिचे आक्रंदन ऐश्वर्यला लहानपणीच अनुभवायला मिळाले. शेवटी बडिलांनी दुसरे लग्न केले आणि ऐश्वर्याला आणि त्याच्या आईला घराबाहेर काढले. आईने मोलमजुरी करून मुलांना वाढविले.<ref> {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.saamana.com/2012/February/18/stambhalekh.htm
| शीर्षक = '''ठसा''', ऐश्वर्य पाटेकर {{मृत दुवा}}
| भाषा = मराठी
}} </ref> ऐष्वरऐश्वर्य पाटेकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात असताना पवार सरांनी ’प्रेरणा’ नावाचे हस्तलिहित काढायचे ठरविले. दहा वर्षे वयाच्या ऐश्वर्यने त्यासाठी स्वतः लिहिलेल्या कविता दिल्या. त्या कविता ऐश्वर्यने लिहिलेल्या आहेत यावर शिक्षकांचा विश्वास बसला नाही, म्हणून त्यांनी त्या कविता नाकारल्या. ऐश्वर्य रडवेला झाल्यावर त्याची आई म्हणाली की याचा अर्थ त्या कविता फारच चांगल्या असल्या पाहिजेत, त्यामुळे त्या नाकारल्यामुळे दुःखी होण्याचे कारण नाही. माध्यमिक शिक्षण काझीसांगवी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लासलगाव आणि [[नाशिक]] येथे झाले. एम.ए. बी.एड. एम.फिल. झाल्यावर ऐश्वर्य पाटेकर [[इ.स. २००४]] पासून [[निफाड]] तालुक्यातील काकासाहेबनगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचा व्याख्याता म्हणून कामलागले. करीतकॉलेज आहेतविना-अनुदानित असल्याने त्यांचा पगार त्यांनी घेतलेल्या तासिकांच्या संख्येनुसार दिला जाई. त्यामुळे पोट रिकामेच राही. याच काळात ऐश्वर्य पाटेकर यांनी ’भुईशास्त्र’ हा काव्यसंग्रह लिहिला.
 
==परिश्रम==
आपण लिहिलेले चांगले की वाईट हे जाणून घेण्यासाठीऐश्वर्य पाटेकर यांनी एक अमोखा मार्ग स्वीकारला.आपण लिहिलेल्या कविता ते [[आनंद यादव]], [[शंकर वैद्य]], [[म.सु. पाटील]] [[अरुणा ढेरे]], [[इंद्रजित भालेराव]], [[द.ता. भोसले]], [[लक्ष्मीनारायण बोल्ली]], पुरुषोत्तम पाटील आदी साहित्यिकांना पाठवू लागले. त्यांच्या उलट उत्तरांवरून ऐश्वर्य पाटेकर यांना आपल्या कवितांतील गुणदोष उमजले. अरुणा ढेरे यांना त्यांच्या कवितांतली दुखरी कळ जाणवली. इंद्रजित भालेरावांना शब्दांमधला जाळ, आनंद यादवांना कवितांमधली अभिजातता आणि [[द.ता. भोसले]] यांना कवितांमधली जीवनभाष्ये जाणवली. पुरुषोत्तम पाटलांनी तर ऐश्वर्य पाटेकरांची कविता डोक्यावरच घ्यायचे बाकी ठेवले होते.
 
सटाणा या गावी भरलेल्या साहित्ययानच्या साहित्य संमेलनात पाटेकरांनी ५० टक्के सवलतीत [[बा.सी. मर्ढेकर]], [[इंदिरा संत]], [[बा.भ. बोरकर]], [[कवी ग्रेस]], [[करंदीकर]], [[चित्रे]], [[ना.धों. महानोर]] यांची पुस्तके खरेदी केली. त्यांच्याहाती पुढेम.सु. पाटलांचे ’कवितेचा रूपशोध’ हे पुस्तक हाती लागले. या सर्वांच्या अभ्यासातून ऐश्वर्य पाटेकर यांची कविता अधिकाधिक चांगली होत गेली.
 
==लेखन==
ऐश्वर्य पाटेकर यांचा भुईशास्त्र हा कवितासंग्रह आहे. शिवाय अनेक [[नियतकालिकांचे दिवाळी अंक|नियतकालिकांतून]] त्यांच्या कथा प्रकासितप्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या ’बाप’ या कथेस इ.स. २००० साली [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळच्या]] दिवाळी अंक कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. याबरोबरच त्यांनी 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड' आणि 'आदी' या एकांकिकाही लिहिलेल्या आहेत. 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड'ला [[इ.स. २००३]] साली [[झी मराठी]] आयोजित एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा एकांकिका महाकरंडक तर 'आदी'ला इ.स. २००३ सालीच सर्वोत्कृष्ट लेखकासाठीचा सायबा करंडक मिळालेला आहे.
 
===भुईशास्त्र===
ऐश्वर्य पाटेकरने लिहिलेला हा कवितासंग्रह [[जानेवारी]], [[इ.स. २०११|२०११]] ला [[श्रीरामपूर]]च्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. 'भुईशास्त्र'तील कविता संवादी, सात्त्विक आणि स्वाभाविकपणाची लक्षणे असणारी आणि संतांच्या परंपरेशी जोडलेली आहे.<ref> {{संकेतस्थळ स्रोत
Line ७२ ⟶ ७९:
 
==पुरस्कार==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार|साहित्य अकादमी युवा पुरस्कार]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11888623.cms
| शीर्षक = युवा साहित्य अकादमी पहिला मान नाशिकला
Line ११९ ⟶ १२६:
* संजय कोरंबे स्मृती पुरस्कार - जालना (इ.स. १९९९)
* रेव्हरंड टिळक पुरस्कार - नाशिक (इ.स. २००९)
* त्यांच्या ’बाप’ या कथेस इ.स. २००० साली [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळच्या]] दिवाळी अंक कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता.
* त्यांनी 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड' आणि 'आदी' या एकांकिकाही लिहिलेल्या आहेत. 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड'ला [[इ.स. २००३]] साली [[झी मराठी]] आयोजित एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा एकांकिका महाकरंडक तर 'आदी'ला इ.स. २००३ सालीच सर्वोत्कृष्ट लेखकासाठीचा सायबा करंडक मिळालेला आहे.
 
==संकीर्ण==
[[इ.स. २०००]] साली [[झी मराठी]]च्या घर कवितांचे या दोन भागांच्या कार्यक्रमात ऐश्वर्य पाटेकरांनी सहभाग घेतला होता.