"अनंत आत्माराम काणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
}}
'''अनंत आत्माराम काणेकर''' (जन्म : [[डिसेंबर २]], [[इ.स. १९०५]] - मृत्यू : [[इ.स. १९८०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, लेखक, पत्रकार होते. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबईतील गिरगावातल्या चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९२७मध्ये बी.ए.झाल्यावर १९२९साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला.
इ.स. १९४१मध्यी अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
== प्रकाशित साहित्य ==
|