"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १५:
संमेलनात गुजराती साहित्यिक धीरुभाई पटेल यांचे उद्‌घाटनपर भाषण तर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर गुजराती, कोकणी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, सिंधी भाषेतील काव्यवाचन आणि दुपारी विविध भाषांमधील कथाकथनाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ' लेखक की कलम से-सृजनात्मक लेखन की मेरी प्रेरणाए ' या विषयावर परिसंवाद आणि विविध भाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
 
==पर्यावरण्प्रेमीपर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन==
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ’पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले.
 
संमेव्लनाच्यासंमेलनाच्या निमित्ताने१४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांतील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए. अबसर यांनी सांगितले.
 
==युवा साहित्य-नाट्य संमेलन==
[[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे]] २३ ते २५ डिसेंबर २०११ दरम्यान पहिले युवा साहित्य-नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. अच्युत गोडबोले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
साने गुरुजी स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्या ८३ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशनकडून जो ८३ लाख रुपयांचा निधी [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापला]] मिळाला त्याच्या व्याजातून हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाच हे संमेलन एक भाग आहे. महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेली वाड्मय मंडळे, कलामंडळे, तसेच अन्य उपक्रमांशी हे संमेलन जोडले जाईल असे संमेलनादरम्यान परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. म्हणाले त्यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, की ’युवा प्रतिभेला मातृभाषेतील साहित्याकडे आकर्षित करणे आणि नव्या प्रतिभेचा शोध घेणे, या हेतूने [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापने]] हा युवा साहित्य-नाट्य संमेलनाचा उपक्रम आयोजित केला आहे’.
 
==फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन==
निर्मिती विचारमंचच्यावतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले. संमेलनादरम्यान, प्रमिला गुरव-डॉ. बाबूराव गुरव व डॉ.जयश्री चव्हाण - डॉ. राजीव चव्हाण या जोडप्यांना सावित्री-जोतिबा पुरस्कार देण्यात आले. पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतील शंभर ग्रंथ, मानचिन्ह व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि स्वागताध्यक्ष अकबर मकानदार होते. या संमेलनाच्या उद्‌घाटनानंतर [[लक्ष्मण माने]] यांचा ‘खेळ साडेतीन टक्क्यांचा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजता ‘जाती अंत’ या विषयावर डॉ. [[भारत पाटणकर]] यांची प्रकट मुलाखत घेतली गेली.
 
हे संमेलन झाल्यानंतर, काही दिवसांनी बलात्काराचे आरोप असलेल्या [[लक्षण माने]] यांना संमेलनात समाविष्ट केल्याबद्दल काही स्त्री-चळवळीतील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.