"महानुभाव पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६१:
बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले, असा आरोप होतो. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे, असे काहींचे मत आहे. चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे म्हटले जाते.
 
==लीळा चरित्राच्या ६व्या आवृत्तीचे प्रकाशन==
चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना उपदेश करताना "दुसऱ्याचा देव म्हणूनी काय दगडे हाणावा', असे सांगून पंथामध्ये धार्मिक सहिष्णुता व वैचारिक समतेचा पायंडा पाडला. स्वामींचे साहित्य समाजातील सर्वस्पर्शी विचारांचे प्रतिबिंब आहे. इसवी सनाच्या १३व्या शतकात पंथीय कार्यात स्त्री व शूद्रांना त्यांनी समाविष्ट केले. हे आरक्षणाचे तत्त्व मांडणारे एक सर्वव्यापी, सामाजिक समतेचंसमतेचे सर्वोत्तम तत्त्व होतंहोते. म्हणून धर्माच्या, जातीच्या नावावर आजवर आपली पोळी शेकणाऱ्यांनी ते दूर ठेवलंठेवले. "धूपम्‌ दीपम्‌ समर्पयामि', अशी मंत्रोक्ती करणाऱ्यांनी नासके नारळ देवाला व चांगले खोबरे स्वतःकरिता ठेवले. या प्रवृत्तीनेच आपला धर्म नासविल्याची खंत प्रा. ढोबळे यांनी व्यक्त केली. यावेळी हिराईसा पाठावर आधारित प्रा. पुरुषोत्तम नागपुरे संपादित "लीळाचरित्र'च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशनही भुजबळ यांच्या हस्ते पार पाडले. सुबोध हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी संजय ठाकरे यांच्या नेतृत्वात "पुत्रम्‌ विशाल देवस्थ तानवा अनंत नायकम्‌' या महानुभवीय सूत्रपाठेतील वचनानंतर मान्यवरांचे स्वागत करणारे स्तवन करण्यात आले. रतन चव्हाण यांच्या गीताला संजय ठाकरे व अशोक ठाकरे यांनी स्वरसाज चढविला होता. यावेळी प्रा. पुरुषोत्तम नागपुरे लिखित "लीळाचरित्र' ग्रंथाची पालखी काढण्यात आली. कार्यक्रमाला प्रभाकरशास्त्री जिंतूरकर, डॉ. सुरेश ठाकरे, राधेराजबाबा पालीमकर, विजय काळे, अजय उभाड, प्रकाश घोम, रमा प्रकाश घोम, गजानन भोरे, प्रताप अभ्यंकर, ऍड.ॲडव्होकेट मधुकर सोनोने, विलास काशीकर, बाबूराव गावंडे, रामेश्‍वर अभ्यंकर, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रकाश घोम, डॉ. अशोक राऊत, गजानन लहाने, डॉ. प्रमोद गोरडे, अनिरुद्ध पाटील, डॉ. अण्णासाहेब अडसोड, विनोद खेरडे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------------------------------
 
==संदर्भ==
* http://bhagvans.blogspot.in/ (महानुभाव पंथाचे संकेतस्थळ)
------------------------------------------------------------------------------------------------
 
==प्रमुख महानुभावी व्यक्ती==