"नाना पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३२:
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] (प्रामुख्याने [[सातारा]], [[सांगली]] भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह '''नाना पाटील''' होत.
 
नाना पाटील यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बहेबोरगाव]] येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.नाना पाटील याना वाळवा गाव खुपखूप आवडत असे.त्यामुले, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ [[तलाठी]] म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. [[इ.स. १९३०|१९३०च्या]] [[सविनय कायदेभंग चळवळ|सविनय कायदेभंग चळवळीपासूनच]] त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
ओळ ४०:
==स्वातंत्र्य लढा==
 
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनीनाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
 
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचानाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी [[इ.स. १९४२]]च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून '''प्रतिसरकार''' ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी [[ग. दि. माडगुळकर]] लिखित [[पोवाडा|पोवाड्यांच्या]] माध्यमातून आणि [[शाहीर निकम]] यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
 
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. [[ब्रिटिश|ब्रिटिशांच्या]] रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
 
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत.आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा [[तुरुंग|तुरुंगात]] गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.
 
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा [[तुरुंग|तुरुंगात]] गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिसबक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाडकऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
 
यांच्यावर [[महात्मा फुले]] यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच [[राजर्षी शाहू|राजर्षी शाहूंच्या]] कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, [[नागनाथअण्णा नायकवडी]] यांसारखे कार्यकर्ते घडले.
 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर [[इ.स. १९७६]] वाळवा मध्ये निधन झाले.मला वाळव्यामधेच दहन करन्यात यावे हिही त्याची इछा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करन्यात आले.
 
==स्वातंत्र्योत्तर काळ==
[[चित्र:Krantisinh-nana-patil1.jpg|600px|thumb|क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै.’दैनिक पुढारी मधीलपुढारी’मधील चित्रमय जीवनवेध…]]
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही]] भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते [[सातारा (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर सातारा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचे]] उमेदवार म्हणून ते [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले [[खासदार]] होते.<ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/11062009/NT000A258A.htm</ref>
 
==संबंधित साहित्य==
* क्रांतिसिंह नाना पाटील (लेखकःलेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
* सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तूतु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
* क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखकःलेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
* क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
* पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
 
==संदर्भ==