"जनार्दन सखाराम करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) (जन्म: कुंदगोळ-जमखिंडी संस्थान, [[फेब्रुवारी १५]] [[इ.स. १८७५]]; मृत्यू : पुणे, [[मार्च १२]] [[इ.स. १९५९) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. ते एक हिंदुत्वनिष्ठ लेखक होते.
 
करंदीकर यांचे इंग्रजी तिसरीपर्यंत (आत्ताच्या आठवीपर्यंतचेसातवीपर्यंतचे) शिक्षण कुंदगोळ येथे झाले. पुढे पुण्यात येऊन ते १८९७साली बी.ए. व नंतर एल्‌‍एल.बी. झाले. त्यांनी इ.स. १९०७ ते १० या काळात प्रा. [[विष्णु गोविंद विजापूरकर]] यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी कोल्हापूर येथे काढलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. इ.स. १९११मध्ये करंदीकर पुण्याच्या केसरी साप्ताहिकात प्रथम लेखक म्हणून आले. ते १९१२मध्ये मुख्य उपसंपादक, आणि १९३३मध्ये मुख्य संपादक झाले. इ.स. १९३७सालापासून ते केसरी-मराठा संस्थेचे ट्रस्टी होते.
 
ज.स. करंदीकरांनी १९२२साली मुळशी सत्याग्रहात आणि १९३०-३१मध्ये स्वातंत्र्य लध्यात भाग घेतला. सश्रम कारावासही भोगला.
 
करंदीकर हे गाढे विद्वान होते. त्यांनी महाभारत, गीता आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. ते पत्रकार आणि ग्रंथकार तर होतेच, पण संशोधक व सूक्ष्म अभ्यासकही होते. ज्योतिष-पंचांग, प्राचीन अर्थशास्त्र यांपासून ते जातिवाद, ब्रिटिशांची राजनीती, ब्रिटिश राजवटीतील आर्थिक व्यवस्थापन इत्यादी विषयांवर त्यांनी सतत ३५ वर्षे वृत्तपत्रीय आणि ग्रंथात्मक लिखाण केले. करंदीकर हे हुंडणावळ, सुवर्णनिर्यात, सरकारी अंदाजपत्रक आदी विषयांचे तज्ज्ञ होते. या क्लिष्ट विषयांवरील त्यांचे लिखाण वाचकांना सुगम वाटे. करंदीकरांच्या लेखांचे एक पुस्तक ’श्री. ज.स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध’ या नावाने दोन खंडांत प्रसिद्ध झाले आहे. करंदीकरांनी आपल्या आयुष्यात विविध विषयांवरची १०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही पुस्तके अशी :-
 
* अन्य लोकांप्रत सुगम यात्रा
* आरंभी
* कौटिल्य अर्थशास्त्र - दोन खंड (संस्कृत पंडित [[बळवंत रामचंद्र हिवरगावकर]] यांच्या सहकार्याने, १९२७)
* गणेशोत्सवाची ६० वर्षे (१९५३)
* गीता तत्त्वमंजरी अर्थात निर्लेप कर्मशास्त्र (१९४७)
* जगातील क्रांतिकारक लढाया (१९०७) -एडवर्ड क्रिसी यांच्या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद. या पुस्तकात इ.स.पूर्व ४९० ते इ.स. १९०५ पर्यंतच्या जगाला कलाटणी :देणाऱ्या १६ युद्धांचा इतिहास आहे.
* [[नरसिंह चिंतामण केळकर]] यांच्या आठवणी
* [[भोपटकर]] गुणगौरव ग्रंथ (संपादित)
* महाभारत
* महाभारत कथाभाग आणि शिकवण (१९५८)
* श्रीसमर्थ चरित्र (१९५३)
* हिंदुत्ववाद (१९४१)