"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३:
आधुनिक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]].
==महाराज कोण होते, कोठून आले?==
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (हे शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टिकरणस्पष्टीकरण केलेदिले आहे. इ.स. २००३ मध्ये ह्या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या श्री शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी श्री सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. हे सत्पुरुष मूळचे तमीळनाडूमधिलतमिळनाडूमधिल तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की श्री महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही ते २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहात. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. ह्याच सत्पुरुषाचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा सर्व तपशील वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृष्ठ ३६२-३६५ वर वाचकांना वाचून पडताळून पहाता येईल. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येतंयेते का? महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) <ref name=dasganu />. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते [[शेगांव]] जि. [[बुलढाणा]] येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले<ref>http://neelkant.wordpress.com/</ref> . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या [[पत्रावळ|पत्रावळीतील]] शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"<ref name=dasganu>लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात{{संदर्भ हवा}}. [[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे.</ref> जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगेम्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||,"
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.
 
{{बदल}}
अक्कलकोटचे [[श्री स्वामी समर्थ ]] आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते.
दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही अजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. साधारणपणे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. काहींच्या मते स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत. मात्र असे म्हणणे चूकीचेचुकीचे होईल, कारण श्री गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थांप्रमाणेच पूर्ण अवताराची आहेत, तसेच श्री गजानन महाराज हे योनी वाचून प्रगटले असण्याची शक्यता असल्यामूळे ते स्वंयसिध्द होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ त्यांचे गुरु नक्कीच नव्हते.
 
हरीभाऊ (स्वामीसूतस्वामिसुत), नाना रेखी (नाना इनामदार), दादाबुवा महाराज या स्वामींच्या शिष्यांनी "श्री स्वामी समर्थ" या नाम मंत्राचा प्रचार केला, मात्र गजानन महाराजांनी कधीच "श्री स्वामी समर्थ" या मंत्राचा जप केला नाही. यावरुनयावरून ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असेच म्हणावे लागेल.
 
स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका १८-१९ वर्षाच्या मूलासमुलास त्यांनी गणपती असे म्हंटलेम्हटले आणि नंतर कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले. जर ते गजानन महाराज होते असे गृहितगृहीत धरले तर १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय ३० व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रगट झाले तेंव्हा त्यांचे वय १८ वर्षेच होते. त्यामूळेत्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हंटलेलाम्हटलेला मूलगामुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते.
 
श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या त्या प्रांतात प्रचार केला, स्वत: स्वामी मात्र सर्वत्र फिरत असतानादेखील कधीच स्वत:चा प्रचार करीत नव्हते, त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज देखील सदैव सर्वत्र फिरत असत मात्र त्यांनी स्वत:चा प्रचार कधीच केला नाही. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्राकर्षानेप्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.
 
===उल्लेखित नावे===
श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातीलवऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
 
===शरीरयष्टी===
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्र विहीनवस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्या प्रमाणेधावल्याप्रमाणे भासणारी चाल गतीचालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..<ref name="maharashtratimes.indiatimes.com">http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms</ref>
 
===अन्नसेवन===
ओळ १०८:
===नोंदी===
[[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.
 
==साहित्य संमेलन==
 
संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.
 
*रिसोड येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.
 
===बाह्य दुवे===