"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१:
 
१. अलसानि पेदन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) <br />
२. '''तिक्कन्न सोमयाजी''' (इ.स. १२२० ते १२९०) : नन्नय्याच्या महाभारताचे अपुरे काम १३व्या शतकातल्या तिक्कन्न सोमयाजी या महाकवीने पुढे नेले. तिक्कन्न हा गौतम गोत्री आपस्तंब ब्राह्मण होता. तो नेल्लोर जवळच्या रंगनाथस्वामींच्या मंदिराजवळ राहात असे. नेल्लोरचा राजा मनुमसिद्धीने तिक्कन्नाची विद्वत्ता पाहून त्याला आपल्या पदरी आश्रय दिला. तिक्काना राजाचा मंत्री, सेनापती आणि राजकवी झाला. या तिन्ही कामगिऱ्या त्याने यशस्वीरीत्या पार पाडल्या. राज्यावर आक्रमण झाले असता तिक्कन्नाने वरंगळच्या गंणपतिदेव राजाच्या मदतीने आक्रमण परतून लावले.
२. तिक्कन्न सोमयाजी (इ.स. १२२० ते १२९०) <br />
 
तिकन्नाने सोमयाग केला म्हणून लोक त्याला तिक्कन्न सोमयाजी म्हणू लागले. गणपती काकतीय या विद्वानाने आंध्रात एकदा एक वादसभा भरवली होती. तिक्कन्नाने त्या सभेत भाग घेऊन जैन आणि बौद्ध पंडितांचा पराभव करून वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले.
 
तिक्कन्नाचे तेलुगू आणि संस्कृत या दोनही भाषांवर प्रभुत्व होते. सोमयाग केल्यावर तिक्कन्नाने, नन्नय्याने अपुरे ठेवलेल्या महाभारताच्या तेलुगू अनुवादाचे काम सुरू केले. नन्नय्या ज्याचा अनुवाद करता करता मरण पावला ते वनपर्व हे अशुभ पर्व आहे या समजुतीने त्याने ते तसेच अर्धवट ठेवून विराट पर्वापासून ते शेवटच्या पर्वापर्यंतचे भाषांतर पूर्ण केले. तिक्कन्नाचा हा पराक्रम पाहून मनुमसिद्धी राजाने त्याला कविब्रह्म अशी पदवी दिली. <br />
३. त्यागराज (इ.स. १७६७ ते १८४७) <br />
४. '''नन्नय्यभट्ट''' (पुराणकाळ) <br />
Line ४८ ⟶ ५२:
६. पिंगळी सूरन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) <br />
७. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०) <br />
८. भद्रभूती
८. भास्कर कवी (इसवी सनाचे १४वे शतक)<br />
९.. '''भास्कर कवी''' (इसवी सनाचे १४वे शतक) : भास्कर कवी आणि त्यांचे अनेक शिष्य यांनी १४व्या शतकात चंपू पद्धतीने रामायण कथा पूर्ण केली. या रामायणाला भास्कर रामायण म्हणतात. आंध्रात गावोगावच्या मंदिरांतून आणि घरोघरीही हे रामायण वाचले जाते.<br />
९. यर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक) <br />
१०. भास्कर कवीयर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक) <br />
नन्नय्यभट्टाचे महाभारताचा तेलुगू अनुवाद करायचे अपुरे काम तिक्कन्न सोमयाजीने १३व्या शतकात पुरे करत आणले. पण जे लिहीत असताना नन्नय्याचा मृत्यू ओढवला ते वनपर्व अशुभ असावे, अशा समजुतीने तिक्कन्न सोमयाजीने वनपर्व अर्धवटच ठेवले. त्या पर्वातील २९००पैकी १६०० श्लोकांचे काम झाले नव्हते. त्यासाठी १४वे शतक उजाडावे लागले. त्या शतकात निपजलेल्या व अन्नवेम्मा रेड्डी या राजाच्या आश्रयाला असलेल्या यर्राप्रगड कवीने वनपर्वाचे काम पूर्ण केले. मात्र श्लोकरचना न करता त्याने वनपर्वाचा अनुवाद प्रबंधरचनेत (निर्मळ प्रासादिक अशा गद्यात) केला. तिक्कन्ना आणि यर्राप्रगड यांची भाषाशैली इतकी एकसारखी आहे.की, दोघांच्या रूपांतरातला फरक सांगणे कठीण आहे. यर्राप्रगडला लोक प्रबंधपरमेश्वर म्हणू लागले, आणि नन्नय्य, तिक्कन्न आणि यर्राप्रगड यांना कवित्रय असे नाव पडले. <br />
१०११. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक) <br />
१११२. '''श्रीनाथ''' (इ.स. १३८० ते १४६०) <br />
काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या [[नैषधीय]] या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डूया या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली. <br />
इ.स. १४२५च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.<br />
त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्‌‍च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.<br />
१२१३. '''क्षेत्रय्या''' (इसवी सनावे १७वे शतक) <br />
हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले. <br />
पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात. <br />