"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशनआहे. संस्थेच्या मराठवाड्यात नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखी काही संस्थाही मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी त्यांनी भरवलेली काही संमेलने :
* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
ओळ ८:
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३रे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन दि.२५ व २६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा हो्त्या.
|