"आदिवासी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आदिवासी साहित्य परिषदेच्या वतीने ३० एप्रिल ते दोन मे २०११ या काळात, चंद्रपूर शहरात तीनदिवसीय आदिवासी साहित्य संमेलन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेणके होते.
 
९वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन ७-८ मे २०११ या काळात नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित झाले. आदिवासी साहित्य-संस्कृती संवर्धन समिती व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री उषाकिरण आत्राम या होत्या.
 
आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये दोन दिवस विभागीय '''आदिवासी साहित्य संमेलना'''चे आयोजन करण्यात आले होते. ५ व ६ जानेवारी २०१२ या काळात महाकवी कालिदास कलामंदिर येथे हे संमेलन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. पुष्पा गावित होत्या.