"अष्टविनायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १:
'''अष्टविनायक''' ही [[महाराष्ट्र]]ातील आठ मानाची व प्रतिष्ठेची [[गणपती]] देऊळेदेवळे आहेत. [[पश्चिम महाराष्ट्र]] व [[कोकण|कोकणात]] स्थित असलेल्या ह्या देऊळांनादेवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.
 
श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण [[भारत|भारतात]] प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, '''सुखकर्ता''', '''दु:खहर्ता''' आणि '''रक्षणकर्ता''' आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.
 
श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांचीया गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -
 
==[[मोरगांव]]==
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
 
जवळच [[कर्‍हाकऱ्हा नदी|कर्‍हाकऱ्हा]] ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या [[डोळे|डोळ्यात]] व [[बेंबी]]त [[हिरे]] बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती [[बुरूज]]सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. [[पुणे]] जिल्ह्यातील [[बारामती]] तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत [[जेजुरी]]चा [[खंडोबा]] हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
 
==[[थेऊर]]==
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या [[कळंब वृक्ष|कदंब]] वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला [[सोंड]] आहे.
पुण्यातील [[पेशवे|पेशव्यांच्या]] घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा [[माधवराव पेशवे]] यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची [[समाधी]]देखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकिर्दकारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
 
पुण्यातील [[पेशवे|पेशव्यांच्या]] घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा [[माधवराव पेशवे]] यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची [[समाधी]]देखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकिर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
 
थेऊर पुणे-[[सोलापूर]] महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, [[हवेली तालुका|तालुक्यात]] असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच [[ऊरळीकांचन]]ला महात्मा गांधींनी स्थापन केलेले [[निसर्गोपचार]] केंद्र आहे.)
 
==[[सिद्धटेक]]==
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे [[भीमा नदी]]वर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांनी जिर्णोद्धारजीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी [[मखर]] असून त्याभोवती चंद्र-सूर्य-[[गरूडगरुड]] यांच्या प्रतिमा आहेत.
 
[[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[कर्जत]] तालुक्यात हे ठिकाण असून [[दौंड]]पासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर [[राशिन]]पासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.
 
==[[रांजणगाव]]==
अष्टविनायकापैकीअष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला [[महागणपती (रांजणगाव)|महागणपती]] असे म्हणतात. हे [[महागणपती (रांजणगाव)|महागणपतीचे]] स्वयंभू स्थान आहे. [[पुणे]]-अहमदनगर मार्गावर [[शिरूर]] तालुक्यात हे ठिकाण आहे.
 
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- [[त्रिपुरासूरत्रिपुरासुर]] या दैत्यास [[शिव]]शंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूरत्रिपुरासुर [[स्वर्ग]]लोक व [[पृथ्वीलोक]] येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.
 
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री [[महागणपती (रांजणगाव)|महागणपती]] उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. [[इंदूर]]चे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
Line ३४ ⟶ ३२:
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात [[माणिक]] असून, कपाळावर [[हिरा]] आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
 
मंदिराच्या चारही बाजूंना [[तटबंदी]]-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. [[कुकडी नदी]]च्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू [[चिमाजी अप्पा]] यांनी या मंदिराचा जिर्णोद्धारजीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
 
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. [[जुन्नर]] तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच [[आर्वी उपग्रह केंद्र]] व [[खोडद]] येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक [[दुर्बिण]] आहे. [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान असलेला [[शिवनेरी]] किल्ला हादेखील जवळच आहे.
 
==[[लेण्याद्री]]==
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धारजीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर [[वाघ]], [[सिंह]], [[हत्ती]] असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
 
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
Line ५१ ⟶ ४९:
 
==[[पाली]]==
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे [[कपाळ]] विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर [[चिरेबंदी]] आहे. मंदिरात प्रचंड [[घंटा]] असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
 
हे स्थान रायगड जिल्ह्यातील [[सुधागड]] तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच [[उन्हेर]]चे [[गरम पाण्याचे झरे]] व [[सरसगड]] हा प्राचीन किल्ला आहे.