"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ३९:
==नाव आणि आडनाव==
 
ही इतिहासकालीन पद्धत मराठी समाजात अजूनही प्रचलित आहे. तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, राजा गोसावी, राजा परांजपे, माधव वझे, शांता शेळके, हरी नरके, लता मंगेशकर, दुर्गा भागवत वगैरे अनेक जणांचे नाव या पद्धतीचे आहे.

==दुहेरी आडनावे==

काही विवाहित स्त्रियांच्या नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहिलेल्या नावांत आधी माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लिहिलेले आढळते. उदा० लीला मस्तकार रेळे, अलका कुबल आठल्ये, भक्ती बर्वे इनामदार, सई परांजपे जोगळेकर वगैरे. कधी काळी व्यवसायाने पाटील वा कुलकर्णी असणाऱ्या व्यक्ती आपल्या नावात दोन आडनावांचा समावेश करतात. विखे पाटील, बुट्टे पाटील, रेडे कुलकर्णी आदी. महाराष्ट्रातील काही कुटुंबांची आडनावे मुळातच दुहेरी आडनावे असतात. पाठकपुजारी, प्रभुदेसाई, ठाकुरदेसाई, प्रभुचिमुलकर, नाईकनवरे, कदमबांडे, पंतवैद्य, रावराणे, रावकवी, मानेशिर्के, राजेशिर्के, मानेशिंदे, पैदुंगटपैधुंगट ही तसली काही उदाहरणे.
 
==बदललेली आडनावे==
 
दक्षिणी भारतीयांना आडनाव नसते, त्यामुळे नावांवरून त्यांची जात ओळखता येत नाही, म्हणून ती आदर्श पद्धत आहे, असे काहीजण समजतात. आडनावावरून जात किंवा गाव समजू नये म्हणून, किंवा अन्य कारणाने काही मराठी माणसे आपले जुन्या काळापासून चालत आलेले आडनाव बदलतात. पण असे असले तरी त्यांची नाव लिहिण्याची एकूण पद्धत बदलत नाही. अशी काही आडनावे म्हणजे आंबेडकर, साठे वगैरे.