"दत्ता हलसगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होत...
(काही फरक नाही)

२३:४९, १४ जून २०१२ ची आवृत्ती

दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये त्यांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच त्यांनी कविता करायला सुरुवात केली. मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते. ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत अशा प्रकारची त्यांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. त्यांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.

त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती.

दत्ता हलसगीकरांचे काव्यसंग्रह

  • आशयघन
  • सहवास