जगन्नाथ मिश्रा (जन्म : बिहार, १९३७; - १९ ऑगस्ट २०१९)हे बिहारचे एकेकाळचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या आयुष्यात तीन वेळा मुख्यमंत्रिपद उपभोगले. १९७५मध्ये पहिल्यांदा, १९८० मध्ये दुसऱ्यांदा आणि १९८९मध्ये तिसऱ्यांदा. १९९०मध्ये केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी बिहार सोडले.