आयकर नियमावलीत बदल करावा अशी विनंती. कराचा फायदा देशासाठी आहे, परंतु कर मधयम पगारदारानेच भरावा असा नियम का आहे? १,१०,०००रूपयापयॅत करात सवलत, या नियमानुसार देशातील अनेक नागरिक उत्पनातून कर भरत नाहीत. या नियमानुसार देशाचा भरपूर महसूल जमा होत नाही. अनेक नागरिक स्वतंत्र उदयोग करत असतात,त्यांचे उत्पन्न दरमहा १०,००० पेक्षा अधिक आहे,परंतु ते कोणताही कर भरत नाहीत. आजमितीला फेरीवाला क्षेत्रात उदयोग करणारे अनेक नागरिक फक्त महानगरपालिकेला नाममात्र भाडेपट्टी भरतात व त्यांनी मिळविलेल्या उत्पनातून कोणताही कर आयकर विभागात जमा होत नाही.

देशातील अनेक नागरिक दरमहा ५००० ते ९००० रूपयापयॅत मासिक उत्पन्न मिळवतात,जे रोजंदारीवर काम करतात,ते नागरिक कोणताही कर भरत नाहीत. आजमितीला देशातील आजी व माजी आमदार,खासदार व नगरसेवक उत्पन्नातून कर न भरता,फक्त इतरांनी कर भरावा व आपण तो पैसा भत्यामाफॅत अथवा जनसेवा करत आहोत असे भासवून कंत्राटदाराकडून टक्केवारीने जमा करतात,या उत्पन्नातूनदेखील कराचे उत्पन्न मिळत नाही.

परिवहनाची कामे करणारे देखील नाममात्र वाषिक कर भरतात,परंतु आयकरात भर पडत नाही.

१,१०,००० ते १,५०,०००रूपयावरील १०% आयकर प्रमाणे दरमहा कमितकमी ९१६ रूपये व जास्तीत १२५० रूपये आयकर भरला जातो.परंतु जो नागरिक १,०९,९०० रूपये उत्पन्न मिळवणार तो १०० रूपये कमी मिळवून ९१६ रूपयांचा फायदा मिळवणार.

१,५०,००१ ते २,५०,००० रूपयावरील २०% आयकर प्रमाणे फक्त १ रूपयाच्या फरकावर दरमहा १२५० अधिक दयायचे.

अशाप्रकारे सामान्य नागरिकाने विचार करून जगायचे व आयकर भरून फक्त सरकारी तिजोरी भरायची,त्यांच्यासाठी लुटणयाकरिता.

करप्रणाली सुटसुटीत व प्रत्येकाला देतानाही आनंद व्हावा अशी असावी.


चर्चेला चांगला विषय आहे. अजयबिडवे १२:४४, २६ ऑगस्ट २००९ (UTC)

"आयकर" पानाकडे परत चला.